27.6 C
Ratnagiri
Monday, June 2, 2025

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे – संचालक हेमराज बागुल

स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय या आशयाने विकसित...

अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

मुलींना देखील शिक्षणाचा न्याय, हक्क मिळाला पाहिजे....

वीज व्यवस्थेतील सुधारणांसाठी विस्तृत अहवाल द्या; आ. किरण सामंत

पावसाळ्यात अखंडीतपणे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासौठी नियोजन करून...
HomeRatnagiriपुढच्या वर्षी लवकर या! आग्रहाचे निमंत्रण देत बाप्पांना प्रेमाचा निरोप

पुढच्या वर्षी लवकर या! आग्रहाचे निमंत्रण देत बाप्पांना प्रेमाचा निरोप

रत्नागिरी शहर परिसरातील मूर्तीचे मांडवी किनाऱ्यावर विसर्जन करण्यात आले.

‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आग्रहाचे निमंत्रण देत आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गणरायाला निरोप देण्यात आला. रत्नागिरी शहरात म ांडवी किनारपट्टी तसेच पांढरा समुद्र, भाट्ये येथे रात्री १० वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन सोहळ्यानंतर आता १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. गेले १० दिवस रत्नागिरीत गणेशोत्सव प्रचंड उत्साहात साजरा केला गेला. दीड दिवस, ५ दिवस, ७ दिवसाचे गणेशोत्सव पार पडल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्यादिवशी १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली.

दुपारी ३ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. रात्री १० वाजेपर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता. यादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त आलेले नाही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा गर्जना करत ढोल, ताशे, बेंजो, डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. रत्नागिरी शहर परिसरातील मूर्तीचे मांडवी किनाऱ्यावर विसर्जन करण्यात आले. तर काही मूर्तीचे भाट्ये किनाऱ्यावर तसेच पांढरा समुद्रावरही विसर्जन करण्यात आले. नाचणे परिसरातील मूर्तीचे तळ्यात विसर्जन झाले. तसेच रत्नागिरी तालुक्यात गावागावातही विसर्जन सोहळे पार पडले.

RELATED ARTICLES

Most Popular