बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सोशल मीडियावर बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकणाऱ्या ट्रोलर्सबद्दल उघडपणे बोलले आहे. हा ट्रेंड संपवण्यासाठी उद्योग क्षेत्रातील लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्याच बरोबर ते असेही म्हणाले की, लोक वर्षानुवर्षे सर्वांवर आरोप करत आहेत. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांची धारणा बदलेल असे इंडस्ट्रीतील लोकांना वाटते. मात्र, असे होत नाही.
अर्जुन पुढे म्हणाला, ‘आता इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र येण्याची आणि याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. कारण लोक त्याच्याबद्दल जे लिहितात ते सत्यापासून दूर आहे. जेव्हा आपण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारे चित्रपट करतो तेव्हा लोकांना ते आपल्या नावामुळे नाही तर चित्रपटामुळे आवडतात. मात्र, आता ते खूप होत आहे आणि ते चुकीचे आहे.
अर्जुन म्हणतो, ‘आपण सर्वांनी याबाबत मौन बाळगून चूक केली आहे. यावर मौन धारण करून प्रत्येकजण स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावत असताना लोक त्याचा गैरफायदा घेऊ लागले. इंडस्ट्रीतील लोक विचार करतात की त्यांचे काम त्यांच्यासाठी बोलेल. मात्र, आता ट्रोल करणाऱ्यांनी ही सवय बनवली आहे.
अर्जुनच्या कामाबद्दल पहायला गेल तर, अर्जुन नुकताच मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन २’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अर्जुनसोबत जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील होते. हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. याशिवाय अर्जुन आकाश भारद्वाजच्या अनटोल्ड आणि अजय बहलच्या ‘द लेडी किलर’मध्ये दिसणार आहे.