27.5 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

iPhone 16 मालिका विक्री सुरू, 5000 रुपयांची झटपट सूट…

Apple iPhone 16 मालिका अधिकृतपणे आजपासून म्हणजेच...

ऋषभ पंतने एमएस धोनीला बांगलादेशविरुद्ध केलेल्या कारवाईची आठवण करून दिली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना...
HomeRatnagiriचौपदरीकरण कामादरम्यान माती दगडाच्या हन 'रॉयल्टी' बाबत खनीकर्म विभागाचे दुर्लक्ष

चौपदरीकरण कामादरम्यान माती दगडाच्या हन ‘रॉयल्टी’ बाबत खनीकर्म विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील महामार्गाचा बराचसा भाग डोंगराळ असल्याने मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई सुरु आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठ्याप्रमाणात दऱ्या डोंगरात सपाटीकरण करण्यात येत असून, यावेळी काढण्यात येणारी माती दगड यांची ‘रॉयल्टी’ बाबत खनीकर्म विभागाला कोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसून आले आहे. महामार्ग विभाग जमा करेल तेवढीच रॉयल्टी स्वीकारली जात असून, खनीकर्म विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रशासनाच्या उत्पन्नाला खिळ बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम १० टप्प्यात सुरु असून रत्नागिरी जिल्ह्यात यातील चार टप्पे येत आहेत. जिल्ह्यातील महामार्गाचा बराचसा भाग डोंगराळ असल्याने मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई सुरु आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःचे हॉटमिक्सरचे प्लॅन्ट लावले आहेत.

रस्त्यासाठी माती उत्खनन केल्यानंतर तीचा वापर त्याच ठिकाणी करणे आवश्यक आहे. परंतु ती अन्यत्र वाहतूक करुन नेली जात आहे. डोंगराच्या दगडींचाही असाच भरावासाठी वापर केला जात आहे. यासाठीची रॉयल्टी संबंधित ठेकेदाराचे बील देताना बांधकाम विभाग काढून घेते. मात्र निश्चित किती रॉयल्टी आहे. याची पाहणी खनीकर्म विभागाकडून होताना दिसत नाही. मागील अनेक वर्षात खनीकर्म विभागाने याची पाहणी केल्याचेही दिसून येत नाही. त्यामुळे खनीकर्म विभाग एक प्रकारे शासनाचे नुकसानच करीत असल्याचे चित्र आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, असुर्डे घाट, निवळी घाट, अंजणारी घाट, वेरळ घाट अशा अनेक घाटांची कामे सुरु आहेत. काही पूर्ण झाली आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात उत्खननही करण्यात आले. खनीकर्म विभागाने या सर्व कामात दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. यामध्ये ठेकेदाराशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular