26.9 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriबाळासाहेबांची शिवसेना तळागाळात भक्कम

बाळासाहेबांची शिवसेना तळागाळात भक्कम

रत्नागिरीतील ग्रामीण भागामध्ये प्रचारादरम्यान ठाकरे शिवसेनेकडून जोर लावला होता.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राऊत यांना दहा हजार मताधिक्य मिळाले आहे. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यातील वजनदार नेते शिंदे गटाकडे आल्यामुळे या मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याची अपेक्षा महायुतीला होती. ग्रामीण भागात शिवसेना तर शहरी भागात भाजपचा बोलबाला असल्यामुळे त्याप्रमाणे प्रचारयंत्रणाही होती. रत्नागिरीमधून राबवली १ लाख ७२ हजार १३९ मतदान झाले होते. त्यात विनायक राऊत यांना ८२ हजारांपेक्षा अधिक मतदान झाले तर महायुतीच्या नारायण राणे यांना ७२ हजारांपेक्षा अधिक मतदान झाले. महायुतीचे राणे विजयी झाले असले तरीही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अपेक्षित आघाडी घेता आलेली नाही.

प्रचारावेळी शिंदे शिवसेनेतील अंतर्गत दुही दिसून आली होती. त्यामुळे समन्वयाचा अभाव दिसून आला होता. अंतिम टप्प्यात शिंदे शिवसेनेकडून त्यावर पांघरूण घालण्यात काही प्रमाणात यशही मिळाले होते. दुसरीकडे रत्नागिरीतील ग्रामीण भागामध्ये प्रचारादरम्यान ठाकरे शिवसेनेकडून जोर लावला होता. त्याचा फायदा ठाकरे सेनेला मिळाल्याची चर्चा सुरू आहे. ज्यातील राजकीय घडामोडीनंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शिंदे शिवसेनेत राहिले. त्यांच्याबरोबर तळागाळातील शिवसेना राहिल्याची अटकळ बांधली जात होती. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत मिळेल असा अंदाज होता; परंतु प्रत्यक्षात हा अंदाज फोल ठरल्याचे आकडेवारी सांगते.

RELATED ARTICLES

Most Popular