30.3 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

२०१९ च्या मंत्रीमंडळात मला घ्यायला हवं होतं ! आ. भास्करशेठ जाधव

२०१९ च्या मंत्रीमंडळात मला घ्यायला हवं होतं,...

सारखाप्यात विजेच्या धक्क्याने वृद्धा ठार, नातू जखमी

साखरपा- जाधववाडी येथील वृद्धेला खांबावरून तुटून लोंबकळणाऱ्या...

चिपळूणमध्ये नव्या इमारतीसाठी आराखडा, तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया

चिपळूण पालिकेची इमारत ब्रिटिशकालीन आहे. पालिकेच्या दोन्ही...
HomeRatnagiriठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यांची चाळण

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यांची चाळण

जिल्ह्यातील लांजा जवळील दाभोळे ते वाटूळ या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य महामार्ग ते ग्रामीण भागापर्यंतचे अंतर्गत रस्ते यांच्या डागडुजीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतू, अजूनही काही रस्ते आहेत ज्यांच्याकडे वर्षोनुवर्षे दुर्लक्षच केले गेले आहे. वारंवार निवेदन, मागण्या करून सुद्धा हे रस्ते ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे वाहतुकीस अयोग्य बनलेले आहेत.

जिल्ह्यातील लांजा जवळील दाभोळे ते वाटूळ या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे. हा रस्ता दुरुस्त यासाठी जनतेकडून आंदोलनेही केली गेली आहेत. या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन, एक प्रकारे तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून मोठया प्रमाणावर सर्व प्रकारच्या लहान मोठ्या वाहनाची वर्दळ होत असल्याने आणि विशेष करून अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे.

हा रस्ता पुर्ण न होण्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून या रस्त्याकडे जाणूनबुजून संबधीत विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नाने या रस्त्यांसाठी जागतिक बँकेने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. तसेच या रस्त्याच्या कामाची ऑर्डर गेल्या दोन वर्षांपूर्वीच निघाली आहे. मात्र येथील बेजबाबदार अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हा रस्ता रखडला असल्याचे लाड यांनी नमुद केले आहे.

ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या राजापूर-लांजा तालुक्यातील दाभोळे ते वाटूळ रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक लेखी निवेदन लाड यांनी नाम. चव्हाण यांना दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular