30.4 C
Ratnagiri
Wednesday, June 11, 2025

मुंबईत ट्रेनचा भयावह अपघात, वेगवान लोकलचे प्रवासी धडाधड कोसळले!

मुंबईमध्ये सोमवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास...

भौगोलिक कामांसाठी ३४ कोटींचा खर्च…

कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शेकडो कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या...

महायुतीच्या हिताला बाधा पोहचू देणार नाही – सुनील तटकरे

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना...
HomeChiplunभोस्ते, परशुराम घाटात धोकादायक वळणे...

भोस्ते, परशुराम घाटात धोकादायक वळणे…

घाटात अनेकदा दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते.

सद्यःस्थितीत भोस्ते घाटातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. परशुराम घाटातील काम अर्धवट स्थितीत आहे. कशेडी घाटाला पर्यायी बोगदा काढण्यात आला आहे. हे सारेच सगळे सुरळीत दिसत असले तरीदेखील या घाटातील अवघड वळणे जीवघेणी असून, पावसाळ्यात या वळणाचा अधिक धोका संभवतो. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा देखील धोका आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात घाटातून प्रवास बिकटच म्हणावा लागेल. गतवर्षीच्या पावसाळ्यात भोस्ते घाटात अनेकदा दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती. परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होती. कशेडी घाटात पोलादपूर हद्दीत भोगावनजीक थोड्याफार प्रमाणात रस्ता दरवर्षीच खचतो आहे. यावर्षीही परिस्थिती वेगळी नाही; परंतु कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्याचे काम पूर्णत्वास गेल्यामुळे तितकासा गंभीर प्रश्न उद्भवणार नाही; मात्र यावर्षीही महामार्गावरील भोस्ते, परशुराम घाटात वारंवार दरड कोसळून घाट वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.

पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काढण्यात आलेल्या गटारांमधून साचलेला कचरा काढण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभागाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. या मार्गावरील भोस्ते, परशुराम हे घाट नागमोडी वळणांमुळे धोकादायक मानले जातात. या घाटात पावसाळ्यात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत तसेच गेल्या तीन-चार वर्षांत या (भोस्ते-परशुराम) या दोन्ही घाटातून रूंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे झालेल्या डोंगरकटाईमुळे दरडीचा धोका अधिक आहे. चौपदरीकरणानंतर भोस्ते घाटातील धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. या घाटातील एक अवघड वळण काढण्यात आले असले तर दुसरे अवघड वळण ठेकेदाराने आणखीनच अवघड करून ठेवल्याने या वळणावर दर दोन दिवसांआड अपघात होत आहेत. गेल्या वर्षभरात या वळणावर अंदाजे ५० ते ६० अपघात झाले आहेत.

४४ किमी रस्त्यावर चालकांची कसरत – कशेडी घाटाचा पायथा ते परशुराम घाटादरम्यानच्या ४४ किलोमीटर रस्त्याचे काम कल्याण टोलवेज इन्फास्ट्रक्चर या कंपनीकडे आहे. अन्य तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीने महामार्ग चौपदरीकरणाचे काम जलदगतीने केले असले तरी संपूर्ण ४४ किलोमीटरच्या रस्त्यात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. कशेडी घाटाच्या पायथा ते भरणेनाकादरम्यानच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात रस्ता समपातळीत ठेवण्यात ठेकेदार कंपनीला अपयश आले आहे. परिणामी, या दरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरून धावणारी वाहने आदळत आपटत धावत असल्याने चौपदरीकरणापेक्षा आधीचा रस्ता चांगला होता, असे म्हणायची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular