मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवाजी पार्कवर ५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तयारीसाठी २ ते ६ ऑक्टोबरपर्यंत उद्धव गटाच्या शिवसेनेला मैदान देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोर्ट म्हणाले- कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, ही याचिकाकर्त्याची जबाबदारी असेल. काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास आयोजक जबाबदार असतील.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगीही शिंदे गटाने मागितली होती, ती न्यायालयाने फेटाळून लावली. बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास शिंदे गटाला आधीच परवानगी आहे. उद्धव गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालय म्हणाले- याचिकाकर्त्यांच्या अर्जावर निर्णय घेताना बीएमसीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळवा घेण्याची परवानगी शिंदे गटाने देखील मागीतली, परंतु, न्यायालयाने ती फेटाळून लावली. बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास शिंदे गटाला आधीच परवानगी आहे. उद्धव गटाच्या याचिकाकर्त्या सुनावणी करतना मुंबई हायकोर्ट म्हणाले, याचिकाकर्त्या अर्जावर निकाल घेण्यात बीएमसीने आपल्या अधिकारांच्या हक्कांमध्ये पुढे आले आहे.
उद्धव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले, ज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांचा समावेश होता. २० जून रोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २० आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते तेव्हा शिवसेनेतील वाद सुरू झाला होता. यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदारांसोबत असल्याचा दावा केला, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सरकार पडल्यानंतर उद्धव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.