27.2 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeKokan१६ तासांचा कालावधी उलटून देखील ट्रेन न सुटल्याने प्रवाशांचा खोळंबा

१६ तासांचा कालावधी उलटून देखील ट्रेन न सुटल्याने प्रवाशांचा खोळंबा

प्रवासी कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकुर-मंगळूरू या ट्रेनची तब्बल सोळा तास वाट पाहत उभे आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने अनेक जादाच्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकुर-मंगळूरू ही गाडीचा त्यात समावेश करण्यात आला होता. मात्र तब्बल १६ तासांचा कालावधी उलटून जाऊन देखील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गाडीच सोडण्यात न आल्याने प्रवाशी वर्ग चांगलाच संतप्त झाला आहे.

गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या धावत आहेत. या मार्गावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी एलटीटी स्थानकातून गाडी सोडण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यानुसार या गाडीचे वेळापत्रक देखील नियोजित केले होते. ऐन गर्दीच्या काळामध्ये ही गाडी धावत होती. मात्र, सद्य स्थितीत तिची वेळ बदलण्यात आली. प्रवासी कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकुर-मंगळूरू या ट्रेनची तब्बल सोळा तास वाट पाहत उभे आहेत. पण ती न सुटल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गावरून धावणाऱ्या अन्य गाड्यांचा आधार घेत कोकण गाठायची वेळ आली.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जवळजवळ सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी आहे. त्या मंगळवारपासून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने आणखी गर्दी होणार आहे. त्यामुळे ही गाडी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असताना रेल्वे प्रशासनाकडून या गाडीबाबत कोणतीच उपाय योजना न केल्याने प्रवाशांना मात्र अन्य गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

इतकं होऊन देखील लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकुर-मंगळूरू ही गाडी १६ तासाचा कालावधी लोटून देखील अद्यापी सोडण्यात न आल्याने प्रवासीवर्गामधून मोठा संताप व्यक्त होत आहे. जादा गाड्यांमुळे आधीच सर्व नियोजनाचे तीन तेरा वाजले असताना नियोजित गाडी सुद्धा वेळेवर न सुटल्याने सगळेच प्रवासी खोळंबले.

RELATED ARTICLES

Most Popular