27.1 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeRatnagiriना. उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री तर ना. नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री

ना. उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री तर ना. नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री

दोन जिल्ह्यांत दोन पालकमंत्री नेमण्याची वेगळा प्रकार यावेळी घडला आहे.

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांना देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांना देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ना. आदिती तटकरे यांची वर्णी लागली आहे. राज्यातील बहुचर्चित पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक बदल केले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वादात आलेले धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद दिलेले नाही. त्यांचें नाव बीडसाठी चर्चेत होते. परंतु त्यांना मोठा विरोध होत होता. यामुळे आता अजित पवार बीडचे पालकत्व सांभाळणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वात संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे. गडचिरोलीत बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे.

तसेच दोन जिल्ह्यांत दोन पालकमंत्री नेमण्याची वेगळा प्रकार यावेळी घडला आहे. दोन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये दोन पालकमंत्री करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ ऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना ही जबाबदारी दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमचे पालकत्व दिले आहे. मुंबई उपनगरची जबाबदारी आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात स्पर्धा होती. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री – उपनगरची जबाबदारी आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात स्पर्धा होती. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे. गडचिरोली- देवेंद्र फडणवीस, नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे – एकनाथ शिंदे, पुणे – अजित पवार, बीड – अजित पवार, सिंधुदुर्ग नितेश राणे, अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, वाशिंम हसन मुश्रीफ, सांगली – चंद्रकांत पाटील, सातारा – शंभुराजे देसाई, छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट, जळगाव- गुलाबराव पाटील, यवतमाळ- संजय राठोड, कोल्हापूर प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, अकोला आकाश फुंडकर, भंडारा – संजय सावकारे, बुलढाणा मकरंद जाधव, चंद्रपूर अशोक ऊईके, धाराशीव – प्रताप सरनाईक, धुळे – जयकुमार रावल, गोंदिया – बाबासाहेब पाटील, हिंगोली- नरहरी झिरवळ, लातूर – शिवेंद्रसिंग भोसले, मुंबई शहर एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर आशिष शेलार / सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नांदेड अतुल सावे, नंदुरबार – माणिकराव कोकाटे, नाशिक गिरीष महाजन, पालघर गणेश नाईक, परभणी मेघना बोर्डीकर, रायगड अदिती तटकरे, सिंधुदुर्ग- नितेश राणे, रत्नागिरी उदय सामंत, सोलापूर जयकुमार गोरे, वर्धा पंकज भोयर, जालना- पंकजा मुंडे.

RELATED ARTICLES

Most Popular