अखेर खुनाला वाचा फुटलीच. तालुक्यातील कोंडये रांबाडेवाडी येथून बेपत्ता झालेल्या वैशाली चंद्रकांत रांबाडे या महिलेचा खून झाल्याचे अडीच महिन्यांनंतर पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले आहे. कोंडये रांबाडेवाडी येथीलच संशयित आरोपी राजेंद्र गोविंद गुरव याने वैशाली रांबाडे हिचा शनिवार दि. २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कुवे येथील जंगलमय भागात खून केल्याचे या तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले दरम्यान, आरोपी राजेंद्र गुरव आणि मृत वैशाली रांबाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यामुळे वैशाली हिने राजेंद्र याच्याकडे वारंवार पैशाचा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळूनच राजेंद्र याने वैशाली हिचा काटा काढल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
घरी परतली नाही – याबाबत लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोंडये रांबाडेवाडी येथील सौ. वैशाली चंद्रकांत रांबाडे(४८ वर्षे) ही शनिवार दि. २९ जुलै २०२४ रोजी कुवे येथे डॉक्टरकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी न परतल्याने तिचे पती चंद्रकांत रांबाडे हे मुंबईहून गावी आले. त्यानंतर त्यांनी रविवार दि. ३० जुलै रोजी लांजा पोलीस ठाण्यात वैशाली. रांबाडे ही बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर लांजा पोलिसांकडून या बेपत्ता वैशाली रांबाडे यांचा शोधबेपत्ता वैशाली रांबाडे हिचे पती चंद्रकांत रांबाडे यांनी बुधवार दि. ११ सुरू होता.
फूस लावून पळविले – फूस लावून पळविले ऑक्टोबर रोजी वैशाली रांबाडे हिच्या बेपत्ता प्रकरणी कोंडये रांबाडेवाडी येथीलच राजेंद्र गोविंद गुरव यांनीच तिला फुस लावून पळून नेल्याची नवी तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून राजेंद्र गुरव याच्यावर भा.द.वि. कलम ३६५, ३६६ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गुरुवार दि. १२ ऑक्टोबर रोजी त्याला लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. याप्रकरणी लांजा पोलीस तपास करत असताना या घटनेत आरोपी राजेंद्र गुरव याने आपणच वैशाली रांबाडेचा खून केल्याचे तपासात कबूल केले, असेदेखिल पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
कुवे जंगलात शोध – लांजा शहरानजीकच्या कुवे येथील जंगलमय भागात आपण तिचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. त्यानुसार शुक्रवारी लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, हेड कॉन्स्टे. अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, सचिन भुजबळराव, दिनेश आखाडे, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टे. नितेश राणे, प्रियांका कांबळे, सुजाता महाडीक, बापूराव काटे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील हेड कॉन्स्टे. जितेंद्र कदम, पोलीस कॉन्स्टे, अमोल दळवी, पोलीस नाईक सुनील माने, चालक चेतन घडशी यांनी कुवे येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कुवे येथील जंगलात जावून याबाबत तपास केला.
ओळख पटली – यावेळी त्याठिकाणी वैशाली रांबाडे हिची तिच्या नातेवाईकांमार्फत ओळख पटविण्यात आली. त्यानंतर त्याठिकाणी वैशाली हिच्या शरीराचे अवशेष, कपडे आणि काही वस्तू सापडल्या. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी मृतदेह वैशाली हिचाच असल्याचे मान्य केले.
लाकडाने प्रहार – याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी बोलताना राजेंद्र गुरव याने दि. २९ जुलै रोजी वैशालीला कुवे येथील जंगलात घेवून गेला होता. त्यानंतर तिच्या डोक्याच्या मागील भागावर लाकडाने जोरदार प्रहार करून तिचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील घटनास्थळी भेट देवून लांजा पोलिसांना तपासात आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी राजेंद्र गुरव यांच्यावर भा.द.वि. कलम ३०२, ३६४, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे हे तपास करीत आहेत.