27.2 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriकाळा बाजार रोखण्याचा प्रयत्न, रेशन ज्या त्या महिन्यातच देणार

काळा बाजार रोखण्याचा प्रयत्न, रेशन ज्या त्या महिन्यातच देणार

तसे झाले नाही तर त्यांचे रेशन परत जाईल आणि पुढील महिन्यात ते मिळणार नाही.

केंद्र शासनाने धान्य नेण्यासाठी पॉस मशिनवरील मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्या त्या महिन्यातील धान्य न घेतल्यास ते पुढे मिळणार नाही. परिणामी, रेशनकार्डधारकांना दर महिन्याला धान्याची उचल करावीच लागणार आहे. या सूचना जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. धान्यातील काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थीना दर महिन्याला मिळणारे रेशन वेळेवर उचलले गेले नाही तर पुढील महिन्यात ते रेशन उचलता येत होते.

त्यामुळे धान्य शिल्लक राहात होते. ते परत कसे द्यायचे आणि लाभार्थीना कसे वितरित करायचे, हा प्रश्न दुकानदारांपुढे निर्माण होत होता; मात्र आता नवीन निर्णयानुसार, त्या महिन्याचे रेशन त्याच महिन्यात उचलणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे झाले नाही तर त्यांचे रेशन परत जाईल आणि पुढील महिन्यात ते मिळणार नाही. त्यामुळे रेशन शिल्लक राहण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. आतापर्यंत त्या महिन्याचे धान्य पुढच्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंत रेशन दुकानावरून घेता येत असे; परंतु आता त्या त्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंतच धान्य घ्यावे लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular