कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे पूरपरिस्थिती तसेच दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यातून रस्ते, संरक्षक भिंती आदींचे नुकसान होते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने, व इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे होणे अत्यावश्यक होते. यासाठी आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले. पावसाळी अधिवेशनात राज्य अर्थसंकल्पामध्ये संगमेश्वर तालुक्यासाठी ९ कोटी ४० लाख आणि चिपळूण तालुक्यासाठी १५ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे-देवरूख, मुरादपूर-मारळ-बामणोली- ओझरे कळकदरा रस्ता रुंदीकरणासह व डांबरीकरण (४ कोटी ९० लाख), देवरूख- मातृमंदिर- विघ्रवली-ओझरे काटवली-कळंबस्ते रस्ता सुधारणा व डांबरीकरण (३ कोटी ८० लाख), आरवली- येडगेवाडी मार्गावरील अरुंद व कमकुवत पुलाच्या ठिकाणी उंच लहान पुलाचे बांधकामासाठी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
चिपळूण तालुक्यातील गुहागर-चिपळूण-कराड मार्गावरील संरक्षक भिंतीसाठी २० गुहागर-चिपळूण- कराड लाख, रस्ता सुधारणा व डांबरीकरणासाठी ९० लाख, गुहागर-चिपळूण-कराड रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, गुहागर-कराड रस्ता संरक्षक भिंतीचे बांधकाम २० लाख, गणेशखिंड- तळवडे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, कळकवणे-तिवरे रस्ता संरक्षक भिंतीचे (गॅबियन वॉल) बांधकाम करणे १ कोटी ८० लाख, खेड-कामथे मार्गावरील कॉजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे (२ कोटी) आदी कामांसाठी निधी मंजूर झाला.