30.3 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

सारखाप्यात विजेच्या धक्क्याने वृद्धा ठार, नातू जखमी

साखरपा- जाधववाडी येथील वृद्धेला खांबावरून तुटून लोंबकळणाऱ्या...

चिपळूणमध्ये नव्या इमारतीसाठी आराखडा, तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया

चिपळूण पालिकेची इमारत ब्रिटिशकालीन आहे. पालिकेच्या दोन्ही...

आरे-वारे किनारी वाहने नेणाऱ्यांना रोका…

काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या पाण्यापर्यंत चारचाकी वाहने...
HomeRatnagiriजिल्ह्यात लम्पीमुळे ६८ जनावरांचा मृत्यू

जिल्ह्यात लम्पीमुळे ६८ जनावरांचा मृत्यू

मागील चार महिन्यांत लम्पीचा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रादुर्भाव वाढत आहे.

जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला असून ५ तालुक्यांमधील १३८ गावांतील ६०६ जनावरांना लागण झाली आहे. सर्वाधिक बाधित राजापूर, लांजा आणि रत्नागिरी या तीन तालुक्यात असून लम्पीमुळे आतापर्यंत ६८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. १७८ जनावरे उपचारानंतर बरी झाली असून ३६० उपचाराखाली आहेत. राज्यभरात लम्पीमुळे बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार महिन्यांत लम्पीचा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रादुर्भाव वाढत आहे. लम्पी नियंत्रणासाठी पुशसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम आखण्यात आली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ६६ हजारांपैकी २ लाख ३५ हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यात सर्वाधिक जनावरे बाधित झालेली आहे. या तीन तालुक्यात लम्पी पसरण्यामागील कारण पशुसंवर्धन विभागाकडून शोधण्यात आले. मागील महिन्यांमध्ये जिल्ह्यात चिखलणी, नांगरणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काही परजिल्ह्यातील जनावरांचा सहभाग होता. राज्यभरात सगळीकडेच लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या स्पर्धांमधून कदाचि लम्पीचा प्रादुर्भाव झाला असावा अशी शक्यता जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वर्तविला आहे.

याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला असून जनावरे एकत्रित येणाऱ्या स्पर्धा किंवा या प्रकारचे नियोजन करू नये असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात लम्पीग्रस्त मोकाट जनावरे रस्त्यावरून हिंडताना दिसत आहेत. त्या जनावरांकडून अन्य जनावरांना लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (ता. १९) दुपारी कसोप ते भाट्ये दरम्यान गुरांचा कळप रस्त्यावरून फिरत होता. त्यातील एका जनावराच्या अंगावर जखमा झालेल्या होत्या.

ते जनावर लम्पीसदृश असण्याचीही शक्यता आहे. अशा जनावरांबाबत प्रशासनाकडून गांभीर्याने भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, लम्पीला आळा घालण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी, असे आदेशही दिले होते.

RELATED ARTICLES

Most Popular