21.5 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraत्यांना स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का !

त्यांना स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का !

आज तरी गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत. उद्या जनमाणसाचा विचार करू. शिंदे यांच्या विद्वत्तेबाबत संशोधन करावं लागेल.

शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. आम्हाला निवडणुक आयोगाला आमची निष्ठा दाखवायची आहे. म्हणून आम्ही प्रतिज्ञापत्र लिहून देणार आहोत. आज तरी गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत. उद्या जनमाणसाचा विचार करू. शिंदे यांच्या विद्वत्तेबाबत संशोधन करावं लागेल. कुणी तरी लिहून द्यायचे आणि त्यांनी ट्विट करायचे हे आम्हाला माहीत नाही का? त्यांना स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का? मला त्यांच्या विद्वत्तेचा अभ्यास करावा लागेल, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

आमदारकीसाठी एकनाथ शिंदे यांचे नावं पुढे करणे ही माझी चूक होती. चुकांसाठी आम्ही जबाबदार आहोत, उद्धव ठाकरे नाहीत, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. खासदार विनायक राऊत तीन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

राजकारणामध्ये झालेली उलथापालथ, एका रात्रीत बदलेलेल राजकारण आणि अनेक शिवसेनेच्या आमदारांची खरेदी विक्री करण्यात आली. चाळीस हून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक शिंदे गटामध्ये सामील झाले. तर काही लोक आपलं मंत्रिपद टिकवण्यासाठी शिंदेंसोबत गेले, असा खोचक टोला राऊत यांनी उदय सामंत यांना नाव न घेता थेट लगावला. काही शिवसैनिकांनी तुम्ही कुठेही जा, आम्ही सेनेतच राहणार आहोत, असं सामंत यांच्या घरी जाऊन सांगितल्याचेही राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular