30.6 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriरिफायनरी प्रकल्प हद्दपार कर रे महाराजा...! गणपतीला विशेष साकडे

रिफायनरी प्रकल्प हद्दपार कर रे महाराजा…! गणपतीला विशेष साकडे

आता एकच जिद्द रिफायनरी रद्द, 'रिफायनरी हटवा कोकण वाचवा' गणपती बाप्पा मोरया' या गजरात घोषणा देत दीड दिवसांच्या गणपतींना विसर्जन मिरवणुकीत निरोप देण्यात आला.

प्रत्येक गणेशोत्सवातून काहीतरी सामाजिक संदेश देत सणांमध्ये प्रबोधन करण्याची परंपरा आजही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे करत असल्याचे दिसते. परंतु, यंदा घरगुती स्तरावरील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना देखाव्यांमधून माहिती, सामाजिक विषयांची मांडणी केली जाते. कोकणातील राजापूर गोवळ येथील पंचक्रोशीत एक आगळावेगळा प्रयोग केला जात आहे.

कोकणातील राजापूर पट्ट्यातील २०गावांमध्ये वाड्यांवर, घरांमध्ये रिफायनरीविरोधातील बॅनर लावण्यात आले आहेत. काही घरांमध्ये रिफायनरीविरोधी देखावे आहेत, तर काही घरांमध्ये यासंदर्भातील घोषणा, पोस्टर बनवून लावण्यात आले आहेत. तर, कोकणातला रिफायनरी प्रकल्प हद्दपार कर रे महाराजा! असे गाऱ्हाणे राजापूर गोवळ पंचक्रोशीतील नागरिकांनी गणरायाला घातले.

रिफायनरी प्रकल्प हद्दपार कर रे… देवा महाराजा असे साकडे कोकणातील राजापूर रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटकांनी थेट बाप्पाला घातले आहे. यासाठी आता रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत निरोप देताना थेट गणपती बाप्पाला साकडे घातले. यावरून आता परिसरातून राजापूर रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनांनी आपला विरोध कायमच असल्याचे गणेशोत्सवात स्पष्टपणे जाहीर केले आहे.

हे देवा महाराजा सालाबादप्रमाणे या वर्षीही तुझं आगमन होऊन तुझं आज वसर्जन होतं आहे. आमचो गोवळ गाव गेल्या पाचशे वर्षांपासूनचा हा का त्याच्या आधीपासूनच तुझो आगमन आमच्या गावात होता का? हा आमच्या पूर्वजांका माहीती. पण आज ह्या तुझ्या गोवळ गावाक रिफायनरीचो भूत येऊन बसता आणि हा भूत एवढा महाकाय असा की त्याचा एवढा समर्थान होता आणि आम्ही आज या पाच गावातील लोका जो काय विरोध करतो हव त्या विरोधाक तू तुझ्या कृपेने मान्य करून घे आणी या पंचक्रोशीतून हा रिफायनरी प्रकल्प हद्दपार करेंरे असा तुका आम्ही साकडं घालतो आणि आमच्या मागणा मान्य कर रे…देवा महाराजा, असे साकडे श्री गणरायाच्या चरणी राजापूर बारसू पंचक्रोशी परिसरातील रिफायनरी विरोधात असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी घातले.

गणरायाला साकडे घालून झाल्यावर ‘आता एकच जिद्द रिफायनरी रद्द, ‘रिफायनरी हटवा कोकण वाचवा’ गणपती बाप्पा मोरया’ या गजरात घोषणा देत दीड दिवसांच्या गणपतींना विसर्जन मिरवणुकीत निरोप देण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular