27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

रत्नदुर्ग किल्ल्यावरून थेट समुद्रात, तरूणीच्या मृत्यूचे गूढ

रत्नदुर्ग किल्ल्यावरून समुद्रात कोसळलेल्या तरूणीचे गूढ हळूहळू...

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...
HomeIndiaरस्ता सुरक्षेबाबत नितीन गडकरींची महत्वाची घोषणा

रस्ता सुरक्षेबाबत नितीन गडकरींची महत्वाची घोषणा

गडकरींच्या घोषणेचा मिस्त्री यांच्या मृत्यूशी संबंध जोडला जात आहे.

आता कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशालाही सीट बेल्ट लावावा लागणार आहे. असे न केल्यास दंड भरावा लागेल. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका मुलाखतीदरम्यान ही घोषणा केली. गाडीच्या समोर बसलेला प्रवासी सीट बेल्ट न लावल्यावर ज्याप्रमाणे अलार्म वाजतो, तशीच यंत्रणा आता मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशालाही केली जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. त्यासाठी कार कंपन्यांना सूचना देण्यात येणार आहेत.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी एका रस्ते अपघातात निधन झाले. ते मर्सिडीजच्या मागच्या सीटवर बसला होते आणि त्यानी सीट बेल्ट घातला नव्हता असे सांगितले जात आहे. गडकरींच्या घोषणेचा मिस्त्री यांच्या मृत्यूशी संबंध जोडला जात आहे.

मागच्या सीटवर सीट बेल्ट लावणे आधीच बंधनकारक आहे, पण लोक त्याचे पालन करत नसून आता दंड आकारण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. ते म्हणाले की, दंड घेणे हा हेतू नसून जनजागृती करणे आहे. ते म्हणाले की २०२४ पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य आहे.

कारच्या मागच्या सीटवर एअरबॅग्ज बसवल्याने कारच्या किमती वाढतील का, या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, लोकांचे प्राण वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की एअरबॅगची किंमत १००० रुपये आहे. अशा स्थितीत ६ साठी सहा हजार रुपये घेतले जातील. उत्पादन आणि मागणी वाढल्याने त्याची किंमत हळूहळू आणखी खाली येईल.

गडकरी म्हणाले की, नियमानुसार भारतात समोरील प्रवासी आणि ड्रायव्हरसाठी एअरबॅग्ज अनिवार्य आहेत. जानेवारी २०२२ पर्यंत, सरकारने कंपन्यांना प्रत्येक प्रवासी कारमध्ये प्रत्येकी ८ प्रवासी असलेल्या ६ एअरबॅग असणे बंधनकारक केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular