26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriकोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोर येण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना पालवी आली होती. उवीरेत १५ टक्के झाडांवर काहींना मोहोर येण्याची स्थिती आहे. त्यावर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणीचा खर्च करावा लागत आहे. नोव्हेंबर महिन्यात गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. हलका पाऊस झाल्याने हा फटका बसला आहे. सध्या बागायतदारांना थंडीची प्रतीक्षा आहे. यंदा पावसाने लवकर विश्रांती घेतली होती. त्यामुळे मुळांना ताण बसला. पालवी फुटलेल्या झाडांवर फवारणी केलेली नाही. त्या झाडांना डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोर येण्याची शक्यता आहे.

पालवी लवकर जून होण्यासाठी बागायतदार औषधांचा मारा करतात. ते साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिले जाईल. या वेळी थंडी पडणे आवश्यक आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कीडरोगांवर लक्ष ठेवावे लागत आहे. जानेवारी, फेब्रुवारी या कालावधीत कैरी तयार होण्याची शक्यता आहे. काही झाडांना डिसेंबर महिन्यात कैरी लागेल. त्याची काळजी घेण्यासाठी झाडांना पाणी दिले जाते. त्यावर औषध फवारणीही केली जाते. हा आंबा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस काढणीयोग्य होईल, असा अंदाज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular