26 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी...
HomeRatnagiriमाकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार - वनाधिकारी दीपक खाडे

माकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार – वनाधिकारी दीपक खाडे

कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये माकड व वानरांचा उच्छाद प्रचंड वाढला आहे.

कोकणातील माकडांचा उच्छाद थांबवण्यासाठी माकडांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. त्याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर कोकणातील माकडांचा बंदोबस्त होणार आहे. त्यासाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांनी दिली. कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये माकड व वानरांचा उच्छाद प्रचंड वाढला आहे. आंब्यापासून भाजीपाल्याचे अतोनात नुकसान करणाऱ्या कोकणातील माकडांचा-वानरांच्या उच्छादावर कायमस्वरूपी तोडगा करण्याची मागणी सुरू होती.

हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला, तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीचे नुकसान झाले, तर नुकसानभरपाईही मिळत नाही कारण, नक्की कशामुळे नुकसान दाखवणे हे सरकारी यंत्रणेला पटवून देणे अशक्यप्राय होते. या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणात अनेक आंदोलने झाली; मात्र त्यातून मार्ग निघालेले नाहीत. त्यामुळे माकडांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular