27.2 C
Ratnagiri
Tuesday, February 17, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriराऊतांची नोटीस म्हणजे रडीचा डाव - नीलेश राणे

राऊतांची नोटीस म्हणजे रडीचा डाव – नीलेश राणे

निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे रडीचा डाव आहे. २०१९ मध्ये आमचा झालेला पराभव आम्ही स्वीकारला. आम्ही त्यानंतर रडारड करीत बसलो नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे. राऊत यांनी कोकणी जनतेची माफी मागायला हवी, असे मत माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्त केले. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले की, पैशाने जर तुमचा पराभव झाला असे वाटत असेल तर तुम्ही दहा वर्षात काय काम केले हे जनतेसमोर ठेवायला हवे होते.

तुमच्याच गावात तुम्ही ‘मायनस’ (कमी मताधिक्य) का झालात याचेही उत्तर तुम्ही जनतेला द्यायला हवे. विनायक राऊत यांच्यात पराभव स्वीकारण्याचे धाडस नसल्यानेच ते आता आरोप करीत सुटले आहेत. त्यांचे प्रयत्न आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आहेत. म्हणूनच त्यांनी नारायण राणे यांची खासदारपदी झालेली निवड रद्द करावी, अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे. कोकणातील जनतेने खासदार राणे यांना तब्बल ५० हजार मतांनी निवडून दिले असल्याचे माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular