27.1 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeKokanशेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेत.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक असणाऱ्या संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या दोन्ही मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. उन्हाळी सुट्टीला गावी आलेल्या भाच्यासह संतोष पाटील यांची दोन्ही मुलं श्रीवर्धन तालुक्यातील वेळास बीचवर फिरायला गेले होते. तेव्हा खोल पाण्यात लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले आणि बुडाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संतोष पाटील यांच्या बहिणीचा मुलगा ऐरोली इथून गावी आला होता. त्याच्यासोबत संतोष पाटील यांची दोन्ही मुलं वेळास बीचवर गेले. बीचवर तिघेही पोहायला समुद्रात उतरले असताना मोठ्या लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले. तिन्ही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्यानं संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संतोष पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी नवी गाडीही घेतली होती. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होतं. पण आता तीन मुलांच्या अशा मृत्यूने पाटील कुटुंब दुःखाच्या सागरात बुडालंय. पाटील यांचे म्हसळा तालुक्यातल्या गोंडघर इथं घर संतोष पाटील यांची मयुरेश आणि अवधुत ही दोन मुलं भाचा हिमांशूसोबत वेळास बीचला गेले होते. हिमांशू मुंबईत राहत असून सुट्टीनिमित्त तो गावी आला होता. तिघांचेही वय २१ ते २६ वर्षे इतकं आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेत.

RELATED ARTICLES

Most Popular