29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeMaharashtra२५ दिवसानंतर आंबा समुद्रमार्गे भारतातून अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचला

२५ दिवसानंतर आंबा समुद्रमार्गे भारतातून अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचला

समुद्रमार्गे भारतातून  आंबा पाठवण्यात आला आहे. तब्बल २५ दिवसानंतर अमेरिकेच्या बाजारपेठेत तो यशस्वीरित्या पोचला.

फळांचा राजा आंबा आणि देश विदेशातून त्याला असणारी मागणी लक्षात घेता. खर्च आणि फायदा यांचा ताळमेळ साधणे गरजेचे आहे. यंदा एक नवीन पर्याय आजमावण्यात आला असून, समुद्रमार्गे भारतातून  आंबा पाठवण्यात आला आहे. तब्बल २५ दिवसानंतर अमेरिकेच्या बाजारपेठेत तो यशस्वीरित्या पोचला. कंटेनरमधील आंबा सुस्थितीत पोहोचल्याचे निदर्शनास आल्यामुळे आयातदारांसह निर्यातदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे निर्यातीवर होणार्‍या खर्चात कपात होणार असून हा खर्च किलोला एक डॉलरपर्यंत येईल. तसेच अमेरिकेच्या बाजारात आंब्याचा दरही कमी होईल, असा विश्‍वास पणन मंडळाकडून व्यक्त करण्यात आला.

भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा यांनी आंबा कंटेनरद्वारे पाठविण्याचा निर्णय घेवून सानप ग्रो निमल्स या निर्यातदाराच्या मदतीने आंबा समुद्रमार्गे पाठविण्यात आला. यामुळे अमेरिकेत आंब्याच्या निर्यातीत वाढ होणार असून आंबा कमी किंमतीत ग्राहकापर्यंत पोचेल. सध्या आंब्याचे विमान भाडे ५५० रुपये प्रतीकिलो असून तीन किलोच्या बॉक्सकरिता सुमारे २० ते २२ डॉलर आकारले जातात. हा खर्च १ डॉलर प्रती किलोपर्यंत कमी होवून निर्यातीस मोठी चालना मिळेल. तसेच अमेरिकन बाजारात भारतीय आंबा किंमतीच्या दृष्टीने इतर देशांच्या आंब्याशी स्पर्धा करू शकतो

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा यांनी आंबा कंटेनरव्दारे पाठविण्याचा निर्णय घेऊन सानप ग्रो निमल्स या निर्यातदाराच्या मदतीने आंबा समुद्रमार्गे पाठविण्यात आला. यामुळे अमेरिकेत आंब्याच्या निर्यातीत वाढ होणार असून आंबा कमी किमतीत ग्राहकापर्यंत पोहोचेल. विमान वाहतूकऐवजी समुद्रमार्गे निर्यात झाल्याने निर्यातीत वाढ होईल. हवाई वाहतुकीत होणारे नुकसान टाळण्यास मदत होऊन आंबा अधिक चांगल्या पध्दतीने आणि उत्तम स्थितीत परदेशी बाजारात पाठवला येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular