टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करचा मृत्यू प्रेम त्रिकोणात झाला की ती ब्लॅकमेलिंगची बळी…? लॉकडाऊननंतर ती तिच्या करिअरबद्दल काय विचार करत होती? मुंबईत न राहता ती इंदूरमध्येच का होती? यातील काही प्रश्नांची उत्तरे अभिनेत्रीने तिच्या सुसाईड नोटमध्ये दिली आहेत. सुसाइड नोटमध्ये वैशालीने राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध कलम ३०६ गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी रविवारीच आरोपी राहुलला ताब्यात घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला घरातूनच पकडले. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली तेव्हा राहुल घरातच होता. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधली संजना तुम्हाला आठवत असेल. किंवा ‘ससुराल सिमर का’ या शोमधील अंजली भारद्वाज, ज्यांना नकारात्मक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन पेटल पुरस्कारही मिळाला आहे. प्रेक्षकांनी वैशालीला सुपर सिस्टर, मनमोहिनी सीझन २ मध्ये देखील पाहिले आहे. रक्षाबंधन ही तिची शेवटची मालिका होती. वैशाली रा. तेजाजी नगर हिने शनिवारी रात्री इंदूर येथील साईबाग येथील राहत्या घरी स्वत:च्या दुपट्ट्याला गळफास लावून आत्महत्या केली.
वैशालीच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानीचा उल्लेख आहे. वैशालीने लिहिले की, ‘राहुलने मला त्रास दिला आहे. त्याने माझ्या मैत्रीचा फायदा घेतला. राहुलने मला इतका त्रास दिला की मला आत्महत्या करावी लागली. राहुलने फसवणूक करून माझे फोटो काढले. मग हे फोटो-व्हिडिओ माझ्या होणाऱ्या नवऱ्याला अभिनंदनला (एनआरआय डॉक्टर-व्यावसायिक) पाठवले गेले. यानंतर वैशाली-अभिनंदन यांचा साखरपुडा तुटला.
वैशालीने डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिले आहे की मा, पापा-भाई तुमच्यावर खूप प्रेम करते, पण राहुल आणि त्याच्या बायकोला शिक्षा द्या. वैशालीने सुसाईड नोटच्या एका पानावर अडीच वर्षांहून अधिक काळ अस्वस्थ असल्याचंही नमूद केलं आहे.