27.9 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeIndiaएअर इंडियाची सूत्रे पुन्हा एकदा टाटा समूहाकडे

एअर इंडियाची सूत्रे पुन्हा एकदा टाटा समूहाकडे

मागील काही महिन्यांपासून सुरु असलेली एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया आज अखेर पूर्ण झाली आहे

भारत सरकारची विमान कंपनी असलेल्या एअर इंडियामध्ये आजपासून टाटा समूह आपली सेवा सुरू करणार आहे. एअर इंडियाचा मालकी हक्क टाटा समूहाकडे सोपवताच निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. एअर इंडियाचे संचलन टाटा समूह करणार असून लवकरच इतर औपचारिक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होण्याकडे वाटचाल सुरु झालेली आहे.

वारंवार तोट्यात असणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानंतर एअर इंडियासाठी नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. केंद्र सरकारने निविदा मागविण्याच्या प्रक्रियेनंतर ८ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या ‘टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड या कंपनी’ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया पार पडली असून, गुरुवारपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपल्या सेवेला सुरूवात करणार आहे.

मागील काही महिन्यांपासून सुरु असलेली एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया आज अखेर पूर्ण झाली आहे. आज टाटा समूह आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या शेवटच्या प्रक्रिया फेरीनंतर आता एअर इंडियावर पूर्णपणे टाटांनी मालकी प्रस्थापित केली आहे. आज सकाळी ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि संपूर्ण माहिती दिली. मात्र, अखेर केंद्र सरकारने यासंदर्भातली अधिकृत घोषणा केली असून आता एअर इंडिया अधिकृतरित्या टाटांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. त्यामुळे टाटांनी पुन्हा एकदा एअर इंडियाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular