भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक दिवस कोहलीच्या कर्णधार पदावरून वाद सुरु होते. आत्ता महेंद्रसिंह धोनी बाबत एक नवीनच गोष्ट ऐकायला मिळत आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, वर्ल्ड कप विजेता महेंद्र सिंह धोनी मर्यादित षटकांच्या प्रकारात मर्यादित षटकांच्या प्रकारात धोनी महान कर्णधार आहे. भारतीय संघ धोनीच्या नेतृत्वात २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कप, २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफी जिंकला असल्याचे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
महेंद्रसिग धोनीचा शांत स्वभाव आणि सामन्या दरम्यानच्या स्थितीवर असलेल्या नियंत्रणामुळे सर्वांपेक्षा वेगळा कर्णधार म्हणून त्याची ख्याती जातो. धोनीला जर कर्णधाराची भूमिका बजावताना पाहिले आणि आयपीएलमध्ये सीएसकेचे कर्णधारपणा पाहिला तर स्थिती आणि नियंत्रण तसेच मनाला शांती मिळते. प्रतिस्पर्धी संघ जरी षटकार आणि चौकार मारत असला तरी धोनी मात्र त्याच्या शांत डोक्याने सर्व मान्य करत असतो असे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
रवी शास्त्री धोनीचे कौतुक करायला थांबतच नाही आहेत. धोनीने आतापर्यंत जे सर्व काही मिळवले ते एक कर्णधार मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये नक्कीच करु शकतो. धोनीने केलेल्या विक्रमांवरुन सर्व काही समजते की, त्याने आतापर्यंत असा कोणताच सामना नाही जो जिंकला नाही? धोनी अनेक सामने जिंकला असल्याचे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी असे म्हटलं आहे की, धोनी आतापर्यंतच्या मर्यादित षटकांच्या प्रकारात सर्वात महान कर्णधार आहे. आयसीसी स्पर्धेत त्यांचा विक्रम, धोनीने जिंकले नाही असे काहीच नाही आहे. आयपीएल, चॅम्पियन्स लीग, सर्व आयसीसी सामने, दोन वर्ल्ड कप, मर्यादित षटकांच्या प्रकाराबाबत सांगायचे झाले तर धोनीच्या जवळही कोणी फिरकले नाही. यामुळे धोनीला आपण किंग काँन्ग म्हणून शकतो.