27.9 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriपरबांचे एसटी कर्मचार्यांना आरपारची लढाई लढू नये, असं कळकळीच आवाहन

परबांचे एसटी कर्मचार्यांना आरपारची लढाई लढू नये, असं कळकळीच आवाहन

दापोली चिपळूण खेड रत्नागिरी संगमेश्वर लांजा एसटी डेपोतील कर्मचाऱ्यानी काम बंद पुकारल्यामुळे आज दिवसभर प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. सदर बंद सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास सुरू करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेक प्रवाशाने मुंबई पुणे ठाणे इतर ठिकाणी जाण्यासाठी आपले रिझर्वेशन केले होते. मात्र ते आपल्या नियोजित ठिकाणी जाऊ शकले नाहीत.

सदर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासन लक्ष देत नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांतून देण्यात आली आहे. तसेच अनेक रुग्ण ग्रामीण भागातून डॉक्टराकडे आले असता त्यांना दापोली स्टॅन्डमध्येच ताटकळत बसावे लागले होते. तसेच अनेक विद्यार्थी एसटी बंदमुळे अडकून पडले होते.

राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना ही आरपारची लढाई लढू नये, असं कळकळीच आवाहन केलं आहे. तसेच, कमिटीचा निर्णय़ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट मान्य करणं किंवा अमान्य करणे हे आता योग्य ठरणार नाही. कारण, आता सद्य स्थितीला जर कोणताही निर्णय घेतला तर तो एक प्रकारे उच्च न्यायालयाचा अपमान ठरेल. असं देखील परब यांनी स्पष्ट केल आहे.

पुढे पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले कि,  मी कर्मचाऱ्यांशी सतत संवाद साधत राहणार आहे, मी त्यांना सतत संप थांबवण्यासाठी आवाहन करत राहणार आहे , याच्यातून काही यशस्वी साध्य झाले,  चांगला मार्ग निघण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. कारण, ज्याप्रमाणे  कर्मचाऱ्यांचे हीत जोपासायचे आहे, तसेच प्रवासी जनतेची सुद्धा गैरसोय होणार नाही,  याची काळजी घेणे मला आवश्यक वाटते आहे.

RELATED ARTICLES

Most Popular