29.6 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeSportsआशिया चषक २०२३ तटस्थ ठिकाणी खेळवणार, पाकिस्तानमध्ये नाही

आशिया चषक २०२३ तटस्थ ठिकाणी खेळवणार, पाकिस्तानमध्ये नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याच्या तयारीत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. आशिया क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की २०२३ आशिया कप तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल. आता पाकिस्तानला आशिया चषकाचे यजमानपदही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त तिसऱ्या देशात खेळला जाईल.

२००८ मध्ये भारताने पाकिस्तानमध्ये शेवटचा सामना खेळला होता. यानंतर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही. तेव्हापासून दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी खेळत आहेत, तेही आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये. दोघांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये खेळली गेली होती. दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजेच २३ ऑक्टोबरला टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत.

२०२३ मध्ये होणारा पुढील आशिया कप एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाईल. हे दोन्ही संघ आशिया चषक २०२२ मध्येही दोन सामने खेळले आहेत. १ सामना भारताने तर १ सामना पाकिस्तानने जिंकला होता.

आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मंगळवारी एजीएमनंतर म्हणाले, ‘आशिया चषक २०२३ तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल. आमच्या संघाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्याबाबत सरकार निर्णय घेते की नाही यावर आम्ही भाष्य करणार नाही. २०२३ च्या आशिया चषकासाठी, ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याच्या तयारीत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular