27.1 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeMaharashtraबालभारती प्रकाशनाच्या कृतीवर आक्षेप

बालभारती प्रकाशनाच्या कृतीवर आक्षेप

बालभारतीच्या द्वारे काढण्यात आलेल्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमासोबत इतर अवांतर असलेली तब्बल ४२६ टन पुस्तके बालभारती रद्दीत काढणार असल्याच्या निविदेबद्द्ल प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून त्यावर अनेक वाद निर्माण झाले आहेत.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या सुरु न झाल्याने बाल भारतीकडून गोदामात शिल्लक असलेली ४२६ मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विक्रीला काढण्यात आली आहेत. बालभारतीने नव्याने छापलेली लाखोंच्या संख्येने पुस्तके राज्यातील ९ विविध ठिकाणच्या गोदामात पडून आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, पनवेल आणि नाशिक येथील  बालभारतीच्या गोदामांचा समावेश आहे. या सर्व गोदामांमध्ये पडून असलेली पुस्तके आता रद्दीत काढण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम बंद होऊन दोन वर्षे झाली असल्याने ही पुस्तके गोदामांत पडून आहेत.

कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष शाळा बंद होत्या त्यामुळे ऑफलाईन शिक्षण बंद असून ऑन लाईन शिक्षण सुरु करण्यात आले होते, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मागील आणि यंदाच्या वर्षी देखील शैक्षणिक वर्षाची पुस्तके प्राप्त झालेली नाहीत. आणि असे असताना बालभारतीकडून इतक्या मोठ्या संख्येने पुस्तके रद्दीत काढून, ती बाद केली जाणार असल्याने त्यावर शिक्षक आमदार नागो गाणार यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने आक्षेप घेतला आहे. इतकी मोठ्या संखेने पुस्तक रद्दीत देण्यापेक्षा, पुस्तके राज्यातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचवली गेली नाहीत ! आणि यासाठी कोण जबाबदार आहे,  असे प्रश्‍न आता निर्माण होऊ लागले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular