29.4 C
Ratnagiri
Sunday, June 1, 2025

रत्नागिरीचा विकास पर्यटकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री उदय सामंत

सामंत म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे कोकणातच पत्रकारिता...

गुटखा वाहतूक करणारी गाडी चिपळुणात पकडली

मुंबई - गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी...
HomeRatnagiriकामगारदिनी रत्नागिरीमध्ये बँक मित्राज असोसिएशनचे धरणे आंदोलन

कामगारदिनी रत्नागिरीमध्ये बँक मित्राज असोसिएशनचे धरणे आंदोलन

बँक खात्यांची योजना कालांतराने जनधन योजना म्हणून राबविण्यात येऊ लागली.

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन या संघटनेने गुरूवारी १ मे या कामगारदिनी धरणा आंदोलन केले. या आंदोलनाला रत्नागिरीतील बँक कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वित्तीय समावेशकता या नावाने सुरू करण्यात आलेली झिरो बॅलन्स असलेल्या बँक खात्यांची योजना कालांतराने जनधन योजना म्हणून राबविण्यात येऊ लागली. पंतप्रधान यांनी या योजनेअंतर्गत करोडो खाती उघडण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले व ही प्राथमिकता देखील बनवली. तुटपुंज्या कर्मचारी संख्येवर हे लक्ष पूर्ण होणे अवघड असल्याकारणाने बँकांनी त्याकाळी बैंकिंग करस्पॉन्डंट म्हणजेच बँक मित्र यांची भरती चालू केली व त्यांच्या माध्यमातून ही कोट्यावधी जनधन खाती उघडण्यात आली. जनधन खात्यांचे काम झाल्यानंतर या बँक मित्रांना बँकिंग उद्योगातील नित्यनेमाचे बचत खात्यातील कॅश भरणा करणे व काढून घेणे ही कामे देखील देण्यात येऊ लागली.

त्याचबरोबर नवीन बचत खाते उघडण्याची कामही हे बँक मित्र करू लागले. पूर्वी बँक त्यांना थेट कमिशनच्या स्वरूपात मासिक आमदनी देत होते. कालांतराने जनधन खात्याची व्याप्ती देखील वाढली आणि कामाचे स्वरूपही खूप वाढले. त्यामुळे बँकेने यातून काढता पाय घेऊन मध्यस्थी नेमले व त्यांच्याकरवी या बँक मित्रांचे नियमन होऊ लागले. स्वाभाविकपणे हे मध्यस्थ म्हणजे सर्विस प्रोव्हायडर कंपनीज यांनी कमिशनचे दर अवास्तवपणे कमी केले. आज हे बँक मित्र स्वतः भाड्याने जागा घेऊन स्वतःचा संगणक’ वापरून त्यावर बँकांचे काम करतात व त्या बदल्यात त्यांना अत्यल्प दराने कमिशन मिळते.

आपल्या अडचणी वारंवार सांगून देखील ना त्या बँका ज्यांच्यासाठी हे काम करतात, ना सर्विस प्रोव्हायडर यांच्या माण्यांकडे लक्ष देत आहेत. अशावेळी सर्व राष्ट्रीयकृत बँकांमधून कार्यरत असलेल्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज अंसोसिएशन या संघटनेने पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य पातळीवर महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन ही यांची संघटना स्थापन केली. गुरूवारी कामगार दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केले. रत्नागिरीमध्ये देखील हे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी करण्यात आले.

काय आहेत मागण्या ? – आज बँक मित्रांना कोणत्याही सेवाशर्ती लागू नाहीत. त्या निर्धारित सेवाशर्ती लागू कराव्यात, बँक मित्र वापरत असलेल्या जागांचे भाडे त्याचप्रमाणे स्टेशनरी व वाहन खर्च यांची भरपाई देण्यात यावी, बँक मित्रांना ते कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने आण करतात त्याचे विमा संरक्षण मिळावे, त्याचप्रमाणे बँक मित्रांना सामाजिक सुरक्षितता लागू करून प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी व पेन्शन या अंतर्गत सुरक्षितता मिळावी या व इतर अनेक मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. या धरणा आंदोलनाचे नेतृत्व रत्नागिरीमधील बैंक मित्राज असोसिएशन या संघटनेचे चेअरमन शैलेश मासये, निमंत्रक निलेश कदम, सह निमंत्रक प्रियांका गावडे, रेश्मा शेलटकर व नितीन पांचाळ यांनी ‘केले. यांना संपूर्ण सहाय्य व पाठिंबा बैंक कर्मचाऱ्यांच्यावतीने महाराष्ट्र स्टेट फेडरेशनचे नेते विनोद कदम व राजेंद्र गडवी यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular