तुझ्या सांगण्यावरून तुझ्या मित्राला मी व्याजाने १० लाख रूपये दिले. तुझ्या मित्राने माझ्या नावावर केलेली जमीन मला नकोय. माझे व्याजाचे पैसे आणि मुद्दल मला परत कर’ असा दम देत बळकावलेली २५ एकर जमीन मध्यस्थी असलेल्या जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला विकत घेण्यास भाग पाडून जमिनीचे खरेदीखत न करता पैसे स्वीकारत फसवणूक केल्याच्या आरोपाखाली रत्नागिरीतील सावकारासह एका वकिलाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे बड्या सावकारांचे धाबे दणाणले होते.
२५ हजारांचे ४५ हजार – या पार्श्वभूमीवर फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत पोलीसांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले की, जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे संदीप मधुकर वेलोंडे यांची आणि निलेश कीर यांची चांगली ओळख होती. वेलोंडे यांनी यापूर्वी निलेश याच्यासोबत व्याजी पैशाचे व्यवहार केले होते. १० टक्के व्याजाने त्यांनी २५ हजार रूपये घेतले होते. व्याजासह ४५ हजार वेलोंडे यांनी कीर यांना दिले होते अशी माहिती फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली आहे. असे पोलीसांनी सांगितले.
मित्राला नड – वेलोंडे यांचा मित्र सुभाष गराटे यांना १० लाख रूपयांची तात्काळ आवश्यकता होती. त्यांनी वेलोंडे यांना याबाबत विचारणा केली. वेलोंडे यांनी निलेश कीर याच्याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांचे फोनवरून बोलणेदेखील झाले. कारागृहासमोरील महापुरूष मंदिराबाहेर त्या तिघांची भेटदेखील झाली होती अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.
तर २५ एकर जमीन माझी – व्यवहाराचे बोलणे सुरू झाले. गराटें यांनी १० लाख रूपयांची व्याजी रक्कमेची मागणी केली. घेतलेली रक्कम व्याजासह ६ महिन्यात परत न केल्यास गराटे यांची ओरी येथे असलेली २५ एकर जमीन निलेश कीर यांच्या नावावर करूनं देण्याबाबत बोलणी झाली. त्यानंतर निलेश कीर यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचारी वेलोंडे यांना मध्यस्थी ठेवून निलेश कीर यांनी १० लाख रूपयांची रक्कम वेलोंडे यांना व्याजी दिली असा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.
वादावादी – जमीन नावावर करून दिल्यानंतर गराटे मुंबई येथे निघून गेले होते व काही दिवसांनी ते पुन्हा रत्नागिरीत आले. यावेळी निलेश कीर आणि गराटे यांची भेट झाली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये वादावादी झाली. ‘ही वादावादी झाल्यानंतर मध्यस्थी वेलोंडे यांना बोलावून घेण्यात आले असे पोलीसांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले.
तुझी वाटच लावतो – गराटे आणि कीर यांच्यात वाद सुरू असताना वेलोंडे त्या ठिकाणी आले व वाद करून पैसे मिळणार नाहीत. तुम च्या नावे आता जमीन झालेली आहे. त्यामुळे आता वाद करून उपयोग नाही. पैशाच्या बदल्यात २५ एकर जमीन तुम्हाला गराटे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय आता तुम्ही येथेच थांबवा असा सल्ला वेलोंडे यांनी दिला. यावेळी निलेश कीर यांनी तुझे कोरे चेक – माझ्याकडे आहेत. तुझी वाटच लावून टाकतो अशी धमकी वेलोंडे यांना दिली असा आरोप फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आला आहे अशी माहिती पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आली.
मध्यस्थाची पाठ धरली – या व्यवहारात मध्यस्थ म्हणून संदीप मधुकर वेलोंडे (रा. ओरी, मधलीवाडी) हे होते. निलेश कीर यांनी मध्यस्थ असलेल्या वेलोंडे यांची पाठ धरली. जिल्हा परिषदेतील त्यांच्या सरकारी कार्यालयात जावून कीर वेलोंडे यांना धमकावत होता असेही तक्रारीम “ध्ये नमूद करण्यात आले आहे.
जमीन तू विकत घे – १० लाखाच्या बदल्यात २५ एकर जमीन कीर यांनी आपल्या नावावर करून घेतली. मात्र ही जमीन कीर यांना नको असल्याने मध्यस्थ असलेल्या वेलोंडे यांना आपल्याकडील जमीन विकत घेण्याचा तगादा लावला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ती २५ एकर जमीन मध्यस्थ असलेल्या वेलोंडे यांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
अबब २५ एकराचे २५ लाख – पोलीसांनी याबाबत पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले की, निलेश कीर याने आपल्या नावावर करून घेतलेल्या जमिनीचा दर २५ लाख रूपये सांगितला होता. वेलोंडे यांचे मित्र देवरूखकर आणि कीर यांचे वकीलांच्या कार्यालयात जमिनीच्या व्यवहाराची बोलणी झाली. या जमि नीचा दर २२ लाख ७२ हजार ठरला. वकिलाच्या कार्यालयात त्यांनी आपले अशिल निलेश कीर यांच्या सांगण्यानुसार २५ एकर जागेचे खरेदीखत तयार केले होते. त्यामध्ये विकत घेणार म्हणून संदीप वेलोंडे तर विकत देणार म्हणून निलेश कीर यांचे नाव होते. ठरल्याप्रमाणे २२ लाख ७२ हजार रोख रक्कम निलेश कीर याला देण्यात आली. त्यानंतर वकिलांच्या समोर या खरेदीखतावर सह्या करण्यात आल्या, असे पोलीसांनी अधिक माहिती देताना पत्रकारांना सांगितले.
रक्कम घेऊन पसार – निलेश कीर याने हातात रक्कम स्वीकारल्यानंतर ही रक्कम मी घरी ठेवून येतो तुम्ही रजिस्टर ऑफिसला या असे सांगितले. त्यानुसार निलेश कीर रक्कम घेऊन घरी निघून गेला व वेलोंडे, देवरूखकर नामक व्यक्ती. आणि कीर याचे वकील हे तिघे रजिस्टर कार्यालयात जावून पोहोचले. एक तास झाला तरी निलेश कीर त्या ठिकाणी आलाच नाही अशी सारी हकीगत तक्रारीमध्ये फिर्यादीने नमूद केली असल्याचे पोलीसांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
वकिलाने शब्द दिला – ज्या दिवशी हे खरेदीखत रजिस्टर होणार होते त्या दिवशी निलेश कीर आलाच नाही. वृकील आणि कीर यांच्या सर्व प्लॅन ठरला होता. वकिलांनी वेलोंडे आणि देवरूखकर यांना शब्द दिला. तुमचे खरेदीखत मी करून देतो, तुम्ही काळजी करू नका, असे सांगून त्या दोघांना घरी पाठवून दिले असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे.
पैसेही गेले, जमीनही गेली – १० लाखाच्या व्याजाच्या रक्कमेपोटी तिसऱ्याच व्यक्तीची जमीन नावावर करून घेऊन ती जमीन २२ लाख ७२ हजार रूपयाला व्याजाच्या व्यवहारात मध्यस्थी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला विकण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून २२ लाख ७२ हजार रूपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली असा तक्रारदाराचा आरोप असून पैसेही गेले, जमिनही गेली असे लक्षात आल्यानंतर वेलोंडे यांनी आता शहर पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून निलेश कीर (रा. मिऱ्या) व संबंधित वकील यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३०८ (३), ३. (५), महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४४, ४५. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.