महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. काळ असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृति दिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून २५० कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा प्रथम अजित पवारांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांनी राज्याची आगामी दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. गेली दोन वर्षे विविध प्रकारच्या आपत्ती, अडचणींचा सामना करत विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे, जे-जे शक्य आहे ते आम्ही करणार आहोत, मी ठामपणे सांगू इच्छितो सर्वांच्या साक्षीने जनतेचा विकास करणारा हा अर्थसंकल्प ठरणार आहे, याची मला खात्री आहे. जनता नक्कीच याचे स्वागत करेल, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प जनतेच्या हिताचे असल्याचे सांगितले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आल्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.
अर्थसंकल्प सादर करताना, आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद करण्यात आली. तर कर्करोग व्हॅनसाठी करणार ८ कोटींची तरतूद.
हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, , रत्नागिरी, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील.
गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव, शिर्डी विमानतळासाठी १५०० कोटींचा निधी, रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटींची निधी, अजित पवारांची मोठी घोषणा.
कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी
कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी १०० टक्के व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना.
ई-वाहन धोरणांतर्गत सन २०२५ पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा १० टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा २५ टक्के करण्याचे उद्दीष्ट. ५००० चार्जिंग सुविधा उभारणार
मुंबई शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतू २०२३ च्या अखेरीस सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी केली.
एसटी महामंडळाला एक हजार नवीन बसेस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागासाठी १३२५२ कोटींच्या निधीची तरतूद.
मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार.
तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार.