30.5 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

बाळ मानेंवर उध्दव ठाकरेंनी सोपविली उपनेतेपदाची जबाबदारी

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यात...

चिपळुणात ३६६ कुटुंबांवर पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीची टांगती तलवार

मागील २० वर्षातील पूर व आपत्कालीन परिस्थितीचा...

कोकण रेल्वेमार्गावर वंदे भारतच्या फेऱ्या वाढविणे अशक्य

कोकण मार्गावरून धावणाऱ्या सीएसएमटी मडगाव वंदे भारत...
HomeMaharashtraऑनलाइन शाळेमध्ये बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज

ऑनलाइन शाळेमध्ये बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज

कोरोनाचे प्रमाण लक्षात घेऊन, शाळा सुरू करण्याबाबत आधी सुद्धा टास्क फोर्स सकारात्मक होते.

मागच्या वर्षाच्या मानाने राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप काही ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची वाढतानाच दिसत आहे. कोरोना लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात आल्याने,  राज्यामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केले आहे.

कोरोना साधारण आटोक्यात आल्याने, राज्यात शाळा,  महाविदयालये कधी सुरु होणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यामध्ये काय परिस्थिती आहे, ते लक्षात घेऊनच पुढचे पाऊल  टाकण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन शाळेमध्ये बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक गूड न्यूज मिळणार आहे. दिवाळीनंतर राज्यात शाळा आणि कॉलेज सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरात लवकर आढावा घेऊन अंतिम निर्णय होईल अशी माहिती अजित पवार यांनी आज दिली. कोरोनाची स्थिती काय असेल ती २ ऑक्टोबरपर्यंत बघायचे आणि त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येणे शक्य होऊ शकते का, यावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवानंतर २० दिवसानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून तिसऱ्या लाटेचा साधारण आढावा घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशा सूचना टास्क फोर्सने राज्य सरकराला दिल्या आहेत. शाळा कधी सुरू कराव्यात याबाबत त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लसीकरण पूर्ण झाल्यास व ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचं कडक पालन करण्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात याव्यात असं मत मांडले होतं. कोरोनाचे प्रमाण लक्षात घेऊन, शाळा सुरू करण्याबाबत आधी सुद्धा टास्क फोर्स सकारात्मक होते.

RELATED ARTICLES

Most Popular