28.2 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriमुंबईहून आलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू...

मुंबईहून आलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू…

सोमगंगा नदीवरील डोह येथे आंघोळीसाठी गेला होता.

धामणसे येथील सोमगंगा नदीच्या डोहात बुडून एका सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवांश श्रवण मोरे (वय ६, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे मृत बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवांश हा त्याच्या नातेवाईकांसोबत मुंबईहून सत्यनारायणाच्या पूजेसाठी आणि पालखीसाठी दिनांक ९ एप्रिल रोजी गावी आला होता. शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या चुलत मामा आणि वाडीतील इतर मुलांसोबत धामणसे जोशी वाडी येथील सोमगंगा नदीवरील डोह येथे आंघोळीसाठी गेला होता. पाण्यात बुडाल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, अधिक उपचारांसाठी त्याला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणी करून सायंकाळी ४.३० वाजता (१६.३० वा.) त्याला मृत घोषित केले.

RELATED ARTICLES

Most Popular