22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriएमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा - बाळ माने

एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा – बाळ माने

चिपळूण, राजापूर या विधानसभा मतदारसंघावरही बाळ माने यांनी दावा केला.

पत्रकारांशी बोलताना माने यांनी सांगितले की, रत्नागिरीतल्या मतदाराला परिवर्तन हवं आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे वरिष्ठांना कळवले आहे. मी मिऱ्याचा सुपुत्र आहे, माजी मंत्री पी. के. सावंत यांचा वारसदार आहे. १०५ आमदार असणाऱ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, ग्रामस्थांना विश्वासात न घेता एमआयडीसीची घोषणा झाली आहे. मिऱ्यामध्ये वनौषधी आहेत, लॉजिस्टिक पार्क सोयीचे नाही. भारती शिपयार्ड कंपनी बंद पडली होती तेव्हा काळजी घेतली गेली नाही. आज जे. के. फाईल्स बंद झाली, निवडणूक जाहीर झाली की घोषणा केल्या जातात, असे आरोप त्यांनी केले आहेत. खासगीत मिऱ्या येथील प्रकल्प हा देवेंद्र फडणवीस यांचा प्रकल्प आहे, असे सांगितले जाते. पण मी त्यांचा निष्ठावान, प्रामाणिक सहकारी आहे.

आमच्या नेत्यांनी आम्हाला बोलावले असते. पण भाजपाने सांगितले नाही. मिऱ्या गावाला एमआयडीसीचे पाणी ३० वर्षे मिळत आहे. ती नळपाणी योजना आमदार स्व. कुसुमताई, अभ्यंकर, स्व. शिवाजीराव गोताड व मी आमदार असताना केली. रत्नागिरीत ४ हजार मिलीमीटर पाऊस पडतो पण २० वर्षांत धरणांचा विकास झाला नाही. मिऱ्याच्या पर्यटन विकासाकरिता भूसंपादनाची गरज नाही, असे माने यांनी ठणकावून सांगितले. बारसू एमआयडीसी जाहिर होऊन २ वर्षे झाली, पण पुढे काही झाले नाही. संरक्षण विषयक प्रकल्प येणार असतील तर आम्ही स्वागत करतो. आम्हाला विकास पाहिजे, पण गुंतवणूकदारांचा विकास नको.

बाल्को प्रकल्पाच्या जागेवर मूळ जागामालकांसाठी २०० कोटींचे पॅकेज करा, त्यांचे पुनर्वसन करा, गरज भासल्यास कायदा बदल करू शकतो, असा दावा माने यांनी केला. रत्नागिरीत लांडगा आला रे आला असं चित्र आहे. गेल्या २० वर्षांत शाश्वत विकास व्हायला हवा होता, तो झाला नाही. जे त्यांनी केले सांगत आहेत ते सरकारने केले आहे. विमानतळ केंद्र सरकारने आणले, त्यात भाजपचे योगदान नाही का? जयगडला इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे तिथे लॉजिस्टिक पार्क करा, डिंगणी-जयगड रेल्वेमार्ग करा, चारपदरी रस्ता करा.. आज कोणीच काही बोलत नाही म्हणून रत्नागिरीकरांची व्यथा प्रकट करतोय, असे बाळ माने म्हणाले.

पार्लमेंट ते पंचायतमध्ये भाजपाची सत्ता असावी हा हेतू ठेवून नरेंद्र मोदी व अमित शहा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या सूचनांनुसार काम करतोय. महाराष्ट्रातही २८८ ठिकाणी आमदार उभे करण्यासाठी संकल्प आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुती म्हणून लढताना आम्ही १० हजार मतांनी मागे पडलो. विधानसभेला मात्र विजयी उमेदवाराला जास्त मते होती. म्हणजे सर्व नेते मंडळींनी ग्राऊंड रिपोर्ट काढावा व कुठे कमी पडलो ते सांगावे, हे माझ व्यक्तीगत मत आहे. रत्नागिरी मतदारसंघासह गुहागरची जागा भाजपला मिळावी. दापोलीत जनाधार वाढला आहे. चिपळूण, राजापूर या विधानसभा मतदारसंघावरही बाळ माने यांनी दावा केला. तसेच सिंधुदुर्गमधील सर्व जागांवर विजय मिळू शकतो.

२०१९ मध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी महायुतीचे प्रामाणिकपणे काम केलं. पण त्याचं फळ भाजपाला काय मिळालं, रत्नागिरीत ते आम्ही भोगतोय. भाजपा व संघ परिवाराच्या मतांना विचारत वेठीला धरू नये सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेचा कौल आहे, त्यामुळे भाजपाचा आमदार होऊ शकतो, हे माझं मत आहे, असेही ते म्हणाले. २०११ मध्ये मी राज्यसभेचा उमेदवार होतो. १९९९ मध्ये उमेदवारी मागितली होती, तेव्हा निवडून आलो. पण २००४, ०९, १४ मध्ये कार्यकर्त्यांची मागणी होती. मी पराभूत झालो तरी २५ हजार मते वाढली. तो जनतेने केलेला पराभव नव्हता तर काही लोकांनी घातपात केला होता, अशीही खंत त्यांनी मांडली.

RELATED ARTICLES

Most Popular