28.4 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraमिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी

मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे स्तब्ध उभ्या राहिल्या, त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही.

देशभरामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला गेला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.

पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच बाहेर पडल्याने, तब्येतीच्या कारणास्तव खबरदारी म्हणून गाडी सावकाश चालवण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे,तेजस ठाकरे तिघेही एकाच गाडीतून आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर मान्यवरही शिवाजी पार्कवर उपस्थित होते.

परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आल्या बद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणी वजा तक्रार अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात सपत्नीक उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. पण, रश्मी ठाकरे मात्र स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहेत.

अ‍ॅड. पाटील यांचे असे म्हणणे आहे कि, या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे स्तब्ध उभ्या राहिल्या, त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे हा राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. त्यांच्या या कृतीमुळे जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular