26.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriअतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, चिपळूणवासीय भीतीच्या छायेखाली

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, चिपळूणवासीय भीतीच्या छायेखाली

तहसीलदार सूर्यवंशी यांनी चिपळूण नगरपालिका आणि पूर बाधित ग्रामपंचायतींना सावधगिरी बाळगण्याचा आणि अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली असून, जिल्ह्याला सोमवारी सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाने एवढा जोर धरल्याने गणेशभक्तांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाची संततधार कायम राहणार असून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे महापुराच्या भीतीने नागरिकांचा डोळ्याला डोळा लागला नाही. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. तहसीलदार सूर्यवंशी यांनी चिपळूण नगरपालिका आणि पूर बाधित ग्रामपंचायतींना सावधगिरी बाळगण्याचा आणि अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. १० तारखेपर्यंत असलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याने चिपळूणवासियांना २२ जुलैची परिस्थिती आठवत आहे. त्यामुळे चिपळूणवासीय भीतीच्या छायेखाली आहेत. नगर पालिका वारंवार नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करत आहे.

दापोलीमध्ये देखील तुफानी पडणाऱ्या पावसामुळे अनेकानी रात्र जागूनच काढल्या. दापोलीमध्ये प्रथमच  एवढ्या पाणी वाढल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी आले आहे. दापोली शहरातील केळकर नाका शिवाजीनगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी, भारत नगर या परिसरामध्ये पुराचे पाणी चार ते पाच फूटापर्यंत वाढल्याने अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले, लोकांची एकच तारांबळ उडाली. रात्री एक नंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पाणी ओसरायला लागल्यावर, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

RELATED ARTICLES

Most Popular