25.9 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeMaharashtraचक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरणार

चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरणार

एकीकडे राज्यात थंडीची चाहुल वाढत आहे, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चक्रीवादळ आज उत्तर तामिळनाडूसह, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ गेल्या सहा तासांत ताशी १० किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे.

एकीकडे राज्यात थंडीची चाहुल वाढत आहे, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणात सतत बदल झालेले अनुभवायला मिळत आहेत. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तामिळनाडूसह पद्दुचेरीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरणार असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.

या चक्रीवादळाचा राज्यातील थंडीवर परिणाम पाहायला मिळणार आहे. चक्रीवादळ सध्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण १५ डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता जाणवणार नाही. चक्रीवादळ वाऱ्याच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या स्थितीमुळे त्याच्या अतिबाहेरील परिघ-घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील १४ जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे ९ ते १६ डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे.

तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. चक्रीवादळ हे पश्चिम-वायव्येच्या दिशेने सरकत असून आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून १० डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग ६५ किमी प्रतितास ते ८५ किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular