27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...
HomeMaharashtraअरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत असणाऱ्या कोमोडीन भागात दाखल झाला, पण अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती निम ण होण्याचा धोका आहे. ते तयार झाले तर संपूर्ण कोकणसह महाराष्ट्र आणि गुजरातला त्याचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ५ जूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि कमी दाबाचे क्षेत्र वाढत जाऊन ७ जूनपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. स्कायमेंट या खाजगी हवामान संस्थेने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात

चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. तर क्युवेदरच्या हवामान अभ्यासकांच्या मते अरबी समुद्राचे तापमान चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी अनुकूल आहे. ते कोणत्या तारखेला येईल याविषयी निश्चित काही सांगता येणार नसले तरीही या चक्रीवादळाचा गुजरातसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका आहे. केरळ किंवा मालदीवच्या आसपास तयार होणारी चक्रीवादळे उत्तरेकडे सरकतात, पण बरेचदा अरबी समुद्रात तयार होणारे हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकण्याऐवजी ओमानकडे जाण्याची शक्यता असते.

RELATED ARTICLES

Most Popular