26.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriप्रशासनाच्या अपयशामुळेच जिल्ह्यात जमावबंदी - अशोकराव जाधव

प्रशासनाच्या अपयशामुळेच जिल्ह्यात जमावबंदी – अशोकराव जाधव

सैरभैर झालेल्या सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली ,काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी व्यक्त केले.

प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. त्याचे कारण सरकार आणि प्रशासन विविध क्षेत्रात अपयशी ठरले आहेत, असे मत काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी व्यक्त केले. सैरभैर झालेल्या सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दापोलीतील चव्हाण या तरुण मुलीबाबत झालेला प्रकार, राजापूरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, संभाजी भिडे यांची विधाने, सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकारला दिलेली चपराक, मणिपूरमध्ये भाजपाने केंद्र व राज्य सरकारच्यावतीने पुरस्कृत केलेल्या दंगली, जिल्ह्यातील विकासकामांबाबतच्या तक्रारी, पर्यावरण आणि आणि विस्थापितांच्या रक्षणाकरिता बारसू प्रकल्पाबाबत पर्यावरण रक्षण आणि विस्थापितांचे रक्षणविरोधात काँग्रेसची भूमिका या सर्वांना कंटाळून जनता काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन आंदोलन करणार आहे.

ही माहिती घेऊन काँग्रेसला रोखण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करत आहे. आंदोलनासाठी येत्या चार ते पाच दिवसांत सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्व काँग्रेसच्या जिल्हा, तालुका, सर्व विभाग, सेल यांची बेसिक जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. १०) दुपारी १.३० वा. काँग्रेस भुवन येथे बैठक होणार आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, महिला सरचिटणीस रूपाली सावंत, कॅप्टन हनिफ खलफे, जनाब कारभारी, अनिल कांबळे, तुळशीराम पवार, ॲड. अश्विनी आगाशे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळी सर्वांनी उपस्थित राहावे, अशी विनंती विश्वनाथ किल्लेदार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular