जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर दारू, गुटख्यानंतर आता गांजा, चरस, अफू, हेरॉईन सारख्या घातक अंमली पदार्थांची छुपी विक्री केली जात आहे. त्यात तरुण, तरुणी आहारी जाऊ लागल्याने भावी पिढी बरबाद होण्याचा धोका आहे. आणि हवा असलेला अमली पदार्थ नाही मिळाला तर हि तरुण पिढी आत्महत्ये सारख टोकाच पाउल उचलताना दिसत आहेत.
रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा येथे गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणावर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडे सुमारे १७,७५० किंमतीच्या ७१ छोट्या-छोट्या पिशव्यांमध्ये भरलेला गांजा हा अमली पदार्थ सापडला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचं नाव अजय कारेकर वय २२, रा. पडवेकर कॉलनी उद्योग नगर, रत्नागिरी असे आहे. मिरकरवाडा येथील पांढरा समुद्राजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास एक युवक संशयास्पद स्थितीत बसल्याचं दिसून आलं. त्याच्याकडे चौकशी केली असता आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल ७१ छोट्या-छोट्या पिशव्यांमध्ये भरलेला गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला. या पदार्थासह तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
कांही तरुण एजंट गुटखा, गांजा, चरस, एमडी, हेरॉईन सारखी पावडर आणून मालवण सारख्या पर्यटन शहरात विकत आहेत. त्यातून जास्त पैसा मिळू लागल्यामुळे एजंटांचा वावर वाढला आहे. तर काही अवैध विक्रेते पाठीला सॅक लावून मोटरसायकलने अशा जीवघेण्या पदार्थाची विक्री करीत आहेत. तर काही मुंबईस्थित व्यक्ती नियमित सिंधुदुर्गात ये-जा करत विक्री करताना आढळले आहेत. अशीही जनतेत चर्चा सुरु आहे.