रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या पूरजन्य परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणाहून पूरग्रस्थानसाठी मदत पुरवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी रत्नागिरी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते भरघोस मदतीसह चिपळूणला रवाना झाले आहेत. चिपळूणमधील परिस्थिती मुसळधार पावसामुळे एकदम गंभीर बनली होती. नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. अनेकांची घरे, वस्ती पाण्याखाली गेल्याने, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारे मदत करण्यासाठी आवाहन केले जात आहे. अनेक ठिकाणाहून मदतही पोहोचवण्यात येत आहे.
पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षातर्फे दोनशे बॉक्स पाणी, पंधराशे बिस्कीट पुडे, दीडशे डझन मेणबत्ती, तांदूळ, शंभर किलो फरसाण, काडेपेट्या, पन्नास चादरी, पन्नास चटया, पन्नास टॉवेल्स, अशी त्वरित मदत पाठवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, तालुका सरचिटणीस नगरसेवक उमेश कुळकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस प्रशांत डिंगणकर, शहरध्यक्ष सचिन करमरकर, शहर सरचिटणीस राजन पटवर्धन, महिला आघाडी सौ. ऐश्वर्या जठार, शिल्पा मराठे, पल्लवी पाटील, संपदा तळेकर युवा मोर्चा शहर अध्यक्ष विक्रम जैन, शहर कामगार आघाडी शहर अध्यक्ष संदीप रसाळ, संदीप सुर्वे, ओंकार फडके, हर्ष घोसाळकर असे दहा जणांचे पथक पहिल्या टप्प्यामध्ये गरजेचे समान घेऊन रवाना झाले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या हितचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी विविध मार्गाने ही मदत कमी कालावधीत गोळा केली असून वाटप करण्यासाठी व पूरग्रस्तांना मानसिक आधार देण्यासाठी हे भाजप कार्यकर्ते चिपळूणमध्ये घटनास्थळी पोहोचले आहेत.