28.9 C
Ratnagiri
Tuesday, November 25, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeLifestyleसणासुदीच्या दिवशी त्वचा विशेष चमकण्यासाठी करा हा उपाय

सणासुदीच्या दिवशी त्वचा विशेष चमकण्यासाठी करा हा उपाय

सणासुदीचा काळ येताच प्रत्येकाला त्वचेची चिंता सतावू लागते. आणि आता सणावारांचा ऑगस्ट महिना सुरू झाला आहे

आजच्या काळात खराब आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.कारण धूळ, माती आणि सूर्यप्रकाशामुळे अनेकांच्या चेहऱ्याची चमक नष्ट होते. त्याचबरोबर सणासुदीचा काळ येताच प्रत्येकाला त्वचेची चिंता सतावू लागते. आणि आता सणावारांचा ऑगस्ट महिना सुरू झाला आहे आणि या महिन्याच्या ११ तारखेला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. दुसरीकडे, रक्षाबंधनाच्या दिवशी कुटुंब आणि भावांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याआधी, प्रत्येक मुलीला तिची त्वचा चमकदार आणि सुंदर दिसावी असे वाटते, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, चेहऱ्यावर चकाकी कशी आणू शकतो हे इथे जाणून घेऊया थोडक्यात.

हा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात चंदन पावडर आणि गुलाबपाणी टाकून पॅक तयार करा. गुलाबामध्ये कोरफडीचे जेल व्यवस्थित मिसळल्यावर त्यात केशराचे धागे टाकून द्रावण तयार करा. आता हा पॅक लावण्यासाठी फेसवॉश आणि सामान्य पाण्याने चेहरा धुवा. आता चेहरा धुतल्यानंतर टोनरने त्वचा स्वच्छ करा आणि कोरडे होऊ द्या. यानंतर एलोवेरा जेल, केशर आणि गुलाबपाणीचा हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटं तसाच राहू द्या. यानंतर ते स्क्रबप्रमाणे काढून टाका. एखाद्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी याचा प्रयोग करावा, आठवड्यातून दोनदा लावल्यास कार्यक्रमाच्या दिवशी त्वचा उजळून निघेल.

फेस क्लीनअप केल्याने त्वचेतील सर्व घाण, मृत त्वचेच्या पेशी सहज काढल्या जातात. त्यामुळे, त्वचेवरील उघडी छिद्र बंद होण्यास मदत होते. यासोबतच चेहऱ्याची त्वचा घट्ट होते. आणि त्वचेला विशेष तजेला येतो.

RELATED ARTICLES

Most Popular