27.6 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeMaharashtraआरोग्य विभागाच्या ऐनवेळी परीक्षा रद्द, विद्यार्थी संतप्त

आरोग्य विभागाच्या ऐनवेळी परीक्षा रद्द, विद्यार्थी संतप्त

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी दिलगिरी व्यक्त केली आहे.

राज्यात शनिवार आणि रविवार आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या गट क व गट ड पदासाठीच्या  परीक्षा घेतल्या जाणार होत्या. पण ऐनवेळी या परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं रात्री देण्यात आली. शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज आणि उद्या होणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली.

परीक्षांच्या नियोजनाचे तीन तेरा कायमच वाजलेले असतात, राज्य सरकारचा गोंधळ कायम दिसून येत असून जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी दिलगिरी व्यक्त केली आहे.

पुढे त्यांनी सांगितले कि, कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहीर केलेल्या जागा या भरणारच आहेत. आरोग्य विभागाची आज दोन दिवस होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाचा आहे आणि आरोग्य विभागाची परीक्षा हि कायमची रद्द झाली नसून त्याची फक्त तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कंपनीने अचानकपणे असमर्थता दाखवल्यामुळे, अशा प्रकारे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आमच्यावर ओढावली आहे. पण विद्यार्थ्यांना नाहक झालेल्या त्रासबद्द्ल मी विद्यार्थ्यांची माफी मागतो.

शासनाने रात्री उशिराने हा निर्णय जाहीर केल्याने अनेक विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. कोणी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी आधीपासूनच प्रवास करत होतं, तर कुणी अगोदरच तिथे परीक्षा सेंटरला जाऊन पोहोचलं होतं. मात्र शासनाने परीक्षेला जेमतेम १२ तास शिल्लक असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांमध्ये परीक्षेच्या पुढील तारखेची घोषणा केली जाईल, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.सोशल मिडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून, त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांची संपूर्ण स्पष्टीकरण देत, माफी मागितली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular