31.5 C
Ratnagiri
Sunday, January 19, 2025

मिरकरवाड्यातील ३१९ बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटीसा

रत्नागिरी शहरानजिकच्या मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर...

दहावी-बारावीच्या हॉल तिकीटवर चक्क जातीचा उल्लेख !

माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शालांत परिक्षांच्या विद्यार्थ्यांना...

विद्यार्थीनीला फाजिल मेसेज पाठवणाऱ्या ‘त्या’ शिक्षकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

विद्यार्थीनीला मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या रत्नागिरीच्या एसटी...
HomeMaharashtraमुंबईत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

मुंबईत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाडयामुळे होणारी काहिली बुधवारीही कायम होती. मुंबईत गेल्या १० वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ केंद्रावर सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दरम्यान, राज्यभरात उष्णतेच्या लाटेने लोकं हैराण झाले असून उष्माघाताचे ८२ रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत गेल्या १० वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद मंगळवारी झाली. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी अधिक नोंदले गेले. यापूर्वी २२ एप्रिल रोजी ३९ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३५.२ अंश सेल्सिअस कम ाल तापमानाची नोंद झाली. हे तापम रान सरासरीपेक्षा ३ अंशानी अधिक होते. सांताक्रूझ केंद्रातील तापमानही सरासरीपेक्षा ६ अंशानी अधिक होते.

जळगावमध्ये सर्वाधिक तापमान – राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमान (४२.४) जळगाव येथे नोंदवले गेले. त्याखालोखाल ठाणे- बेलापूर केंद्रात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह, ठाणे, रायगड येथे उष्णतेची लाट कायम असेल मात्र त्याची तीव्रता कमी असेल. तसेच कोकणातील काही भागात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यानंतर पुढील दोन तीन दिवसानंतर तापमानात आणखी २ ते ३ अंशानी घट जाणवू शकेल असेही स्पष्ट केले आहे.

उष्माघाताचे पाच नवे रुग्ण – राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. तीन दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये धुळयामधील तीन तर ठाणे व सोलापूरमधील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे ७७ रुग्ण आढळून आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular