25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeSportsदशकांचा विक्रम मोडला, विश्वचषक सामन्यात भारत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून हरला

दशकांचा विक्रम मोडला, विश्वचषक सामन्यात भारत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून हरला

भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे, जो कोणत्याही विश्वचषकात झाला आहे.

टी -20 विश्वचषकाच्या सुपर -12 फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे. विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारताला लाजिरवाणा पराभव दिला.

दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 151 धावा केल्या होत्या, भारतीय संघाची फलंदाजी पूर्ण अपयशी ठरली. केवळ विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 68, मोहम्मद रिझवानने 79 धावा केल्या.

टी -20 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला पराभव

टी -20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. अन्यथा, भारताने 2007 ते 2016 पर्यंत टी -20 विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तानला नेहमीच पराभूत केले आहे.

टी -20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना

  • 2007- भारताने पाकिस्तानचा पराभव केला (बॉल आऊट)
  • 2007 – भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला (अंतिम)
  • 2012 – भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला (कोलंबो)
  • 2014 – भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला (ढाका)
  • 2016- भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला (कोलकाता)
  • 2021- पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला (दुबई)
RELATED ARTICLES

Most Popular