26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriचाकरमान्यांचा यंदा प्रवास होणार खड्‌ड्यातूनच - महामार्गावरील स्थिती

चाकरमान्यांचा यंदा प्रवास होणार खड्‌ड्यातूनच – महामार्गावरील स्थिती

पर्यायी मार्गावर काही ठिकाणी तात्पुरती डांबराची मलमपट्टी केली होती.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. हे काम करताना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढलेले आहेत; मात्र त्या पर्यायी मार्गावर भलेमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास खडतरच होणार आहे. महामार्गाचे चौपदरीकरण करताना जुना डांबरी रस्ता खोदण्यात आला आहे. तिथे बाजूने पर्यायी रस्ता केलेला आहे. त्या पर्यायी मार्गावर काही ठिकाणी तात्पुरती डांबराची मलमपट्टी केली होती.

पावसाळ्यात त्या पर्यायी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. तिथे तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन ठेकेदारांना सूचना देणे गरजेचे आहे. या रस्त्यालगत संरक्षण भिंत घालताना बाजूच्या रस्त्यावर माती टाकल्यामुळे तिथे वाहने चालवताना अडचणी येत आहेत. या मार्गावरून किमान दोन वाहने जाऊ शकतील, असा रस्ता होईल अशी काळजी घेतली पाहिजे. नव्याने तयार केलेला मार्ग वाहतुकीला खुला होईपर्यंत पर्यायी मार्गाचे तत्काळ उपाययोजना केल्या तर वाहनचालकांना त्याचा फायदा होईल.

काही ठिकाणी पुलाचे बांधकाम चालू असताना तिथे सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा अपघात होऊ शकतो. aगणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांचा रेलचेल असते. या परिसरात योग्य व्यवस्था केली गेली नाही तर वाहतूककोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular