महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या सोहळ्यासाठी राज्यातून आणि परराज्यातून अद्याप सुमारे सहा लाख भाविकांनी पंढरी् नगरीत हजेरी लावली आहे. कोरोना काळामध्ये अनेकांच्या वारीमध्ये खंड पडला. पुंडलिक वरदे… ज्ञानोबा तुकारामच्या गजरात पंढरीनगरी न्हावून निघाली आहे. टाळ मृदुंगाचा गजर आणि भगव्या पताकांनी चंद्रभागेचा परिसर फूलून गेला आहे. श्री विठ्ठलाची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून, तेही पंढरीत दाखल झाले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेह त्यांच्यासोबत आहेत.
कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा दांडगा उत्साह पाहायला मिळत आहे. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग झाले आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.
त्याचबरोबर गेली ५० वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला. माधवराव साळुंखे हे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गेली ५० वर्ष ते न चुकवता पंढरपूरची वारी करत आहेत. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.