25.7 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRatnagiriऐन पावसाळ्यात आंबा कलमांना मोहोर - बागायतदार चिंतेत

ऐन पावसाळ्यात आंबा कलमांना मोहोर – बागायतदार चिंतेत

पावसाळा सुरू असतानाच मोहोर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वातावरण सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम निसर्गातही पाहायला मिळत आहे. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला असतानाच रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे आंबा कलमांना ऑगस्टमध्ये मोहोर आल्याने बागायतदार चिंतेत पडले आहेत. भविष्यात यापासून उत्पन्न मिळणार का, अशा विवंचनेत बागायतदार पडले आहेत. पावस परिसरातील कुर्धे परिसरातील अभिजित डोंगरे यांच्या १२ ते १३ कलमांना मोहोर आला आहे. आता आलेला मोहोर टिकण्याची शक्यता कमी असल्याने थंडीच्या कालावधीत पुन्हा मोहोर येणार की नाही, अशी भीती बागायतदारांना पडली आहे.

जून ते सप्टेंबर यादरम्यान पाऊस असतो. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान हापूस कलमांना नवीन पालवी फुटून मोहरे येतो. फेब्रुवारी महिन्यापासून एप्रिल ते मे दरम्यान हापूस आंबा बाजारात येण्यास सुरवात होते. एप्रिल, मे मध्येच हापूस आंब्याचे आगमन होत असेल प्रामुख्याने गुढीपाडव्यानंतर मुहूर्त केला जायचा, परंतु सध्या मोठ्या प्रमाणात आंबा बागेमध्ये होणाऱ्या फवारण्या कल्टारचा वापरामुळे काही ठिकाणी फेब्रुवारीपासूनच आंब्याचे उत्पादन येण्यास सुरवात झाली आहे; परंतु पावसाळ्यात कलमांना मोहोर येण्याची घटना घडली नव्हती. त्यामुळे पावसाळा सुरू असतानाच मोहोर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular