29.8 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraबच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटले !

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटले !

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर समेट घडवण्यात यश मिळाले.

आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता. या गंभीर आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. राणांच्या आरोपांना आज आमदार बच्चू कडू यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद संपल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मेळाव्यात जाहीर करण्यात आले असले, तरी मेळाव्यातून झालेली मंत्रिपदाची मागणी पाहता सत्तेत राहूनही सरकारवर दबावगट निर्माण करण्याचे बच्चू कडूंचे प्रयत्न राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सत्तेत सहभागी होण्यासाठी बच्चू कडूंनी गुवाहाटी येथे पैसे घेतल्याचा आरोप बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर देताना दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर समेट घडवण्यात यश मिळाले. बच्चू कडूंनी प्रहारच्या मेळाव्यात शक्तीप्रदर्शन करतानाच हा वाद संपल्याचे जाहीर केले. पण, रवी राणांसह इतर विरोधकांना पुन्हा आमच्या वाट्याला जाऊ नका, असा गर्भित इशारा बच्चू कडूंनी दिला.

सत्तारूढ आघाडीतील दोन आमदारांचा ‘खोक्यांवरून’ झालेला वाद सरकारसाठी परीक्षेचा ठरला होता. बच्चू कडू यांनी आपण प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांनी सरकारसोबत राहण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू राज्यमंत्री होते, सत्तांतरानंतर लगेच त्यांना मंत्रिपद मिळेल, ही कार्यकर्त्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नव्हती. प्रहारच्या मेळाव्याच्या माध्यमातून ही मागणी पुढे रेटण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. सोबतच सरकारकडून शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांच्या काही मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी दबावगट निर्माण करण्याचे सुतोवाच बच्चू कडू यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular