21.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunचिपळूणमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी आम. शेखर निकम यांची धडपड

चिपळूणमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी आम. शेखर निकम यांची धडपड

रत्नागिरी जिल्ह्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या मर्यादेबाहेर कोसळण्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. सामान्य नागरिकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान घडून आले आहेत. मागील दोन वर्षापासून कोणती न कोणती नैसर्गिक आपत्ती कोकणावर येऊन धडकतच आहे आणि शेतीपासून ते घरापर्यंत सर्वाची वाताहत लागली आहे.

अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासंदर्भात चिपळूण शहराला वारंवार येणाऱ्या पुरापासून वाचविण्यासाठी काही महत्वाच्या उपाययोजना योजण्यासाठी कार्यतत्पर आम. शेखर निकम यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व्यथा  मांडली.

चिपळूण शहरात वाशिष्ठी नदी काही ठिकाणी नागमोडी वळणाने वाहते, अशा ठिकाणी नदीच्या प्रवाहाला खोली आणि रुंदीकरण करुन उचित दिशा देणे आवश्यक आहे. नदीच्या आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी व शिवनदी पात्रातील गाळ काढणे गरजेचे आहे, तसेच संपूर्ण वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करुन सीमांकन करणे आवश्यक आहे. वाशिष्ठी नदीमध्ये बहाद्दूरेशख नाका-फरशी पुलाजवळील पेढे-नाईक कंपनी पेठमाप ब्रीजच्या खालील बाजूस मातीचे बेट निर्माण झाले आहे ते हटवणे आवश्यक आहे.

गोवळकोट खाडी भागातील गाळ काढणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी मातीचा उपसा करायचा आहे तेथील गाळ जिथे भाराव टाकण्याची गरज आहे त्या भराव टाकण्यासाठी वापरावा. जंगलतोडीवर बंदी आणावी, खाजगी जमिनी जंगल वाढीसाठी वन विभागाकडे वर्ग करण्याची तरतुद करण्यात यावी. चिपळूण शहरातील नदीकिनारी वृक्ष संवर्धनासाठी ग्रीन बेल्ट असतो तसा संपूर्ण नदीकिनारी भाग आरक्षित करण्यात यावा. डोंगर खोदण्यास व उत्खननास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी.

जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील यांनी आम. निकम यांचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन अशा विविध कायमस्वरूपी उपाययोजना होणेबाबत चर्चा करून, या सर्व मु्द्यांवर लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular