29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRatnagiriरत्नागिरीत दोघांवर मुंबई एटीएसची कारवाई

रत्नागिरीत दोघांवर मुंबई एटीएसची कारवाई

रत्नागिरीतील बेकायदेशीर इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालवणाऱ्या दोघांचा मुंबई एटीएस च्या मदतीने रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. रत्नागिरी आठवड्या बाजारामध्ये श्री टेक चे मालक अरविंद विचारे यांच्या दुकानांमध्ये कॉलिंगचा सर्वर बसवण्यात आला होता. मुंबई एटीएस कडे रत्नागिरी मधून इंटरनॅशनल कॉलिंग होत असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे रत्नागिरी पोलीस या सर्व प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

मुंबई एटीएसला मिळालेल्या माहिती नुसार रत्नागिरीतून सुरू असलेले अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणांमध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. दहशतवादी कारवाई करण्यासाठी अशा प्रकारच्या पद्धतीचा वापर केला जातो, अशी माहिती या संबंधित तज्ज्ञांनी सांगितले आहे. कॉलिंग सेंटर एका ठिकाणी असून ऑपरेट दुसऱ्या ठिकाणाहून केले जाते.

रत्नागिरी आठवडा बाजारातील विचारे यांच्या दुकानात इंटरनॅशनल कॉलिंग सर्वर बसवलेला असून ऑपरेट मात्र मुंबई वांद्रे येथून केले जात आहे, याची माहिती मुंबई एटीएस पथकाला मिळाल्यामुळे रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने या प्रकरणात छडा लावण्याचे काम सुरू आहे.

या इंटरनॅशनल कॉलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी फैजल रजाक अली रजाक्क सिद्दिकी हा पनवेल येथील रहिवासी असून रत्नागिरीमध्ये येत असल्याची खबर मुंबई एटीएस पथकाला मिळाली. रत्नागिरी पोलीसांच्या सहाय्याने फिल्डिंग लावून त्याला साळवी स्टॉप येथेच ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणांमध्ये रत्नागिरीतील अरविंद विचारे आणि फैजल सिद्दिकी या दोघांच्याही विरोधात पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांकडून या प्रकरणातील इत्यंभूत माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये अशा प्रकारची सुद्धा प्रकरणे समोर येऊ लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular